श्रीरामपुर येथे घरेलू महिला कामगार कार्यशाळा संपन्न | युवाग्राम विकास संस्थेचा उपक्रम

श्रीरामपुर येथे घरेलू महिला कामगार कार्यशाळा संपन्न

श्रीरामपुर:

घरकामगार हे समाजातील एका मोठ्या उत्पादक वर्गाला सेवा पुरवतात. या प्रक्रियेत त्यांना जगण्यासाठी उत्पन्न मिळते. असंघटित क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा वर्ग असलेल्या घरकामगार महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या प्रचंड समस्या, कामाच्या ठिकाणी असुरक्षितता, कामाची अनिश्चितता आणि अत्यल्प वेतन अशा अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या घरकामगार स्त्रिया आजही सामाजिक सुरक्षा पासून वंचित आहेत. त्यासाठी प्राध्यापक संभाजी पवार यांंच्या युवाग्राम विकास संस्था गेल्या दोन वर्षापासून सातत्याने मजबुतीने कार्यरत आहे.त्यांचा कामाला आमचे सहकार्य व पाठबळ राहील असे प्रतिपादन स्नेहालय संस्थेच्या बालभवन प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख यांनी केले.

श्रीरामपूर युवाग्राम विकास संस्था व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जून रोजी श्रीरामपूर येथे ‘घरेलू महिला कामगार संघटना कार्यशाळा’ घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर होते. याप्रसंगी युवाग्राम संस्थेचे अध्यक्ष संभाजी पवार,संचालक फिरोज शेख,अमोल सोनवणे, शायिस्ता शेख,अनिता शेलार,आदित्य पवार आदि मान्यवर ऊपस्थित होते.

युवाग्रामचे अध्यक्ष संभाजी पवार म्हणाले की,कोणतेही काम श्रेष्ठ दर्जाचे किंवा हलक्या प्रतीचे नसून, सर्व समान व एकमेकास पूरक आहे.हे जरी खरे असले तरी घरकाम करणाऱ्या घरेलू कामगार महिलांना समाजात फारच उपेक्षेने वागवले जाते. घरेलू कामगार महिला असंघटित क्षेत्रात काम करणा-या घरेलू कामगार महिलामध्ये एकजूट नसल्यामुळे ते आपल्या हक्काविषयी आणि अधिकाराविषयी जागृत नाही.त्यामुळे “ज्यांचे प्रश्न… त्यांचे नेतृत्व आणि त्यांचाच आवाज” या मुद्द्याला घेऊन संघटनात्मक बांधणी केली तर प्रश्न सुटण्यास मदत होईल,असे संभाजी पवार यांनी स्पष्ट केले.

जेष्ठ पत्रकार राजेद्र वाडेकर म्हणाले की, घरकामगार कोणाचे उपकार घेत नाहीत. तर तेही श्रमिक आहेत. त्यांचा आदर त्यांच्या हक्काचे रक्षण आणि त्यांच्या जीवनमानाचा विकास हा समाजाचा आणि शासनाचा दोघांच्या जबाबदारीचा भाग आहे. युवाग्राम संस्थेच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी मुलांच्या शिक्षणाचे महत्व सांगून,प्रशिक्षण घेऊन प्रगती करण्याचे महिलांना आवाहन केले.
स्वागत शायिस्ता शेख, तर आभार अनिता शेलार यांनी मानले. सूत्रसंचलन अमोल सोनवणे यांनी केले.
……
फोटो –
श्रीरामपूर युवाग्राम विकास संस्था
व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथे ‘घरेलू महिला कामगारांची कार्यशाळा’ घेण्यात आली.

Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News