श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.मंदिर परिसरात संशयास्पद हालचाल आढळताच ग्रामस्थांनी सतर्कता दाखविल्याने चोरट्यांचा डाव फसला आणि त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.घटनेनंतर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.तपासादरम्यान पोलिसांनी रविंद्र भिमराज कापसे (वय ३८, रा. वाकडी, ता. राहाता),अक्षय बाबासाहेब खरात (वय २६, रा. वाकडी, ता. राहाता) आणि अमोल लक्ष्मण पारे (वय ३२, रा. रेनुकानगर कॉलनी, येवला रोड, कोपरगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलीस चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना सदरच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.
