बळीराजाचा देवाकडे साकडे; दमदार पावसासाठी प्रार्थना | खरीपातील पिकांची मान टाकायला सुरुवात, शेतकरी चिंतेत

मान्सून सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज ऐकून आनंदलेला श्रीरामपूर तालुका आणि उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा, जून संपता-संपता पावसाच्या गायब...

baliraja

मान्सून सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज ऐकून आनंदलेला श्रीरामपूर तालुका आणि उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा, जून संपता-संपता पावसाच्या गायब झाल्याने उदास आणि चिंतेत आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी):

यंदाच्या वर्षी मान्सून सरासरी पेक्षा अधिक राहणार असल्याच्या हवामान अंदाजाने आनंदून गेलेला श्रीरामपूर तालुका तसेच उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा जून महिना संपता संपता पाऊसच गायब झाल्याच्या काळजीने काळवंडून गेल्याचे दुर्दैवी चित्र सध्या आहे.


गेल्या २० ते २५ दिवसांपासून मोठ्या पावसाने उघडीप दिली आहे.मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीत ओल निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या उरकल्या होत्या.खरिप हंगामात आतापर्यंत ६५ टक्क्यांपर्यंत पेरण्या झालेल्या असून
यातील बहुतांश पिके आता माना टाकू लागली आहेत.कपाशी,मका,सोयाबीन आणि चारा पिकांची अवस्था पावसाअभावी वाईट झाली आहे.


दररोज सकाळपासून आभाळ भरून आलं की सोसाट्याचा वारा सुरू होतो.त्यामुळे पावसाचे जमा झालेले ढग वाऱ्याच्या बरोबरीने ओढले जाऊन श्रीरामपूर तालुका परिसर कोरडाठाक राहत आहे.


काही ठिकाणी शेतकरी भर पावसाळ्यात पिकांना पाणी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले थोडेफार पाणी देतांना दिसत आहे. जिल्ह्यात एक लाखांहून अधिक हेक्टरवर कपाशीची लागवड झाली असून आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होणार आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात पावसाचे प्रमाण सुरवातीला अधिक होते. तर जिल्ह्याच्या उत्तर भागात जेमतेम पाऊस झाला.एकही मोठा पाऊस झाला नसल्याने त्या जेमतेम पावसावर पेरण्या केलेले शेतकरी आता संकटात सापडले आहेत.बळीराजा आता पावसासाठी देवाचा धावा करत आहे

शेतकरी वर्ग आता देवाकडे पावसासाठी साकडं घालत आहे.
बळीराजाची नजर आता आकाशाकडे, तर मनात प्रार्थना — “एकदाचा पाऊस पडो.”

Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!