बळीराजाचा देवाकडे साकडे; दमदार पावसासाठी प्रार्थना | खरीपातील पिकांची मान टाकायला सुरुवात, शेतकरी चिंतेत

baliraja

मान्सून सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज ऐकून आनंदलेला श्रीरामपूर तालुका आणि उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा, जून संपता-संपता पावसाच्या गायब झाल्याने उदास आणि चिंतेत आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी):

यंदाच्या वर्षी मान्सून सरासरी पेक्षा अधिक राहणार असल्याच्या हवामान अंदाजाने आनंदून गेलेला श्रीरामपूर तालुका तसेच उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा जून महिना संपता संपता पाऊसच गायब झाल्याच्या काळजीने काळवंडून गेल्याचे दुर्दैवी चित्र सध्या आहे.


गेल्या २० ते २५ दिवसांपासून मोठ्या पावसाने उघडीप दिली आहे.मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीत ओल निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या उरकल्या होत्या.खरिप हंगामात आतापर्यंत ६५ टक्क्यांपर्यंत पेरण्या झालेल्या असून
यातील बहुतांश पिके आता माना टाकू लागली आहेत.कपाशी,मका,सोयाबीन आणि चारा पिकांची अवस्था पावसाअभावी वाईट झाली आहे.


दररोज सकाळपासून आभाळ भरून आलं की सोसाट्याचा वारा सुरू होतो.त्यामुळे पावसाचे जमा झालेले ढग वाऱ्याच्या बरोबरीने ओढले जाऊन श्रीरामपूर तालुका परिसर कोरडाठाक राहत आहे.


काही ठिकाणी शेतकरी भर पावसाळ्यात पिकांना पाणी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले थोडेफार पाणी देतांना दिसत आहे. जिल्ह्यात एक लाखांहून अधिक हेक्टरवर कपाशीची लागवड झाली असून आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होणार आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात पावसाचे प्रमाण सुरवातीला अधिक होते. तर जिल्ह्याच्या उत्तर भागात जेमतेम पाऊस झाला.एकही मोठा पाऊस झाला नसल्याने त्या जेमतेम पावसावर पेरण्या केलेले शेतकरी आता संकटात सापडले आहेत.बळीराजा आता पावसासाठी देवाचा धावा करत आहे

शेतकरी वर्ग आता देवाकडे पावसासाठी साकडं घालत आहे.
बळीराजाची नजर आता आकाशाकडे, तर मनात प्रार्थना — “एकदाचा पाऊस पडो.”

Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News