श्रीरामपूर-
श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी आशिया यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती त्रिभुवन यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नीट पेपर परीक्षेच्या घोटाळ्याचे धागेदोरे अनेक जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत.त्यामध्ये अजून तरी अहिल्यानगर तसेच श्रीरामपूरचे नाव नसले तरीही काही खाजगी क्लास चर्चेत आहेत.जिल्ह्यात श्रीरामपूरमध्ये पहिलीपासून पदवीधर शिक्षणापर्यंत खाजगी कोचिंग क्लासचे अक्षरशा पेव फुटले असून लातूर प्रमाणेच श्रीरामपूर पॅटर्नच्या नावाखाली स्पर्धा वाढली आहे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खाजगी क्लास बंद करावेत यासाठी मुख्यमंत्र्यांवर चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
