सेवानिवृत कर्मचाऱ्यांचा भरपावसात एल्गार;धरणे आंदोलन करत नगरपालिका प्रशासनाचे वेधले लक्ष

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पालिका कार्यालयासमोरच धरणे आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाच्या पहिल्या दिवशी दुपारी पाऊस कोसळला. मात्र आपल्या...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पालिका कार्यालयासमोरच धरणे आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाच्या पहिल्या दिवशी दुपारी पाऊस कोसळला. मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांनी मंडप सोडला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत एकाही पालिका अधिकऱ्याने आंदोलनाची दखल घेतली नाही.श्रीरामपूर नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनच्यावतीने हे आंदोलन सुरू आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दहा, वीस व तीस वर्षांनंतर अनुज्ञेय ठरणारी लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करून फरक अदा करावा, या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यींच्या एकाकी पदाची वेतन निश्चिती चुकीची केली आहे. त्यात दुरूस्ती करून  वेतन निश्चिती करून देय रक्कमा त्वरीत दिल्या जाव्यात, अनेक कर्मचारी निवृत्त होऊन एक वर्ष होऊन गेले तरीही त्यांचे उपदान व सेवा निवृत्ती वेतन लागू केलेले नाही. अशा कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन सुरू करावे, सेवा निवृत्तीनंतर  तीन महिन्यांमध्येच सर्व देय रकमा अदा करून सेवा निवृत्ती वेतन लागू करणे आवश्यक असते. मात्र पालिका अधिकऱ्यांकडून दान वर्षे उलटूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आयुक्त कार्यालयास योग्य पाठपुरावा केला जात नाही. जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जाते. त्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार होत असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.या सर्व मागण्यांसदर्भात २ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने संघटनेने आंदोलनाचा पावित्रा घेतला. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष रमेश अपिल, संजय आढाव, रावसाहेब काळे, भानुदास जाधव, विनोद चव्हान, भानुदास थोरात, बाळासाहेब जाधव, हिवराळे सुदामा, झुंगा शेळके, अनिल झिंगारे, बाळासाहेब चव्हान, चंद्रकांत सोनवणे, लताबाई जगधने, ताराबाई झिंगारे, माणिक जाधव, ज्ञानदेव आमराव, अनिल काजळे, नर्मदा  सुरडकर, आदींनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.

मुख्याधिकारी मागील दाराने…
दररोज दुपारी जेवनाच्या सुटीत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप हे पालिकेच्या समोरील बाजूने जात असतात. मात्र आंदोलनकर्ते पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेले होते.यावेळी मुख्याधिकारी यांनी पालिकेच्या मागील दाराने जाने पसंत केले. गेल्या अनेक दिवसांपासून हे सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या मागण्या प्रशासनाकडे मांडत असून त्याची दखल घेतली जात नाही. उलट आंदोलनाकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!