जर्सी गोऱ्हे केली प्रांताधिकाऱ्यांच्या हवाली; संगमनेर प्रांत कार्यालयात शिवआर्मी व शेतकरी संघटनेचे आंदोलन

श्रीरामपूर-शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा तसेच वन्यप्राणी जीव संरक्षण कायदा मागे घ्यावा अथवा प्रतिभाकड जनावर वीस हजार रुपये प्रति महिना शेतकऱ्यांना...

श्रीरामपूर-
शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा तसेच वन्यप्राणी जीव संरक्षण कायदा मागे घ्यावा अथवा प्रतिभाकड जनावर वीस हजार रुपये प्रति महिना शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे,या मागण्यांसाठी संगमनेर येथील प्रांत कार्यालयात शिवआर्मी संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने जर्सी गोऱ्हे घालत संगमनेरचे प्रांताधिकारी यांच्या ताब्यात दिले.आंदोलन प्रसंगी संगमनेरचे प्रांताधिकारी यांनी 11 जर्सी गोऱ्हे रीतसर पंचनामा करून ताब्यात घेऊन याबाबत शासनाकडे आपण पशुपालकांची समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासित केले.
भाकड गाई व जर्सी गोऱ्हे यांच्या पालनपोषणाचा मोठा प्रश्न गेल्या काही काळापासून निर्माण झाल्याने प्रांत कार्यालयात जर्सी गोऱ्हे घालून आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिव आर्मी संघटनेचे दत्ता ढगे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की, 2015 पर्यंत आपल्या देशात गोवंश हत्या बंदी कायदा अस्तित्वात नव्हता. त्यावेळी आपला देश डेन्मार्क या देशाला मागे टाकत बीफ व दुग्ध उत्पादनात अग्रेसर राहत त्या निर्यातीतही पुढे होता.

संगमनेर येथील प्रांत कार्यालयात शिवआर्मी संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने जर्सी गोऱ्हे घालत संगमनेरचे प्रांताधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आली.

त्यावेळी शेतकऱ्यांना भाकड गाई व जर्सी गोऱ्हे यापासून दोन पैसे मिळत होते. परंतु 2015 नंतर हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी सरकार अस्तित्वात आले. त्यांनी गोवंश हत्या बंदी कायदा व वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा अस्तित्वात आणल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वच शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हानी पोहोचली आहे. गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे कुरेशी समाजाने जनावरे खरेदी-विक्री बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुउत्पादक पशूंचे पालन पोषण करणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे झाले आहे. या बाबींचा गंभीर परिणाम शेतकरी सदर जनावरे ओढे , नाले, नद्या अशा सार्वजनिक ठिकाणी सोडताना दिसत आहे. त्यामुळे साहजिकच सदर जनावरांवर कुत्र्यांसारखे इतर हिंस्र प्राणी हल्ला करून तसेच उपासमारीने जनावरे मरत आहे. याबाबतचा परिणाम पर्यावरणावर  होत असून दुर्गंधी सुटत आहे. तरी शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा तसेच वन्यप्राणी जीव संरक्षण कायदा मागे घेण्यात यावा अथवा प्रतिभाकड जनावर वीस हजार रुपये प्रति महिना शेतकऱ्यांना थेट गोठ्यात अनुदान द्यावे.शासनाने निर्मित केलेल्या भाकड जनावरांसाठीच्या गोशाळा या फक्त अनुदान लाटण्याकरता आहेत. वास्तविक गोवंश हत्या बंदी कायद्यामध्ये सुधारणा करून देशी गोवंश हत्या बंदी कायदा अशा प्रकारे अस्तित्वात आणणे गरजेचे होते. जर्सी व होस्टेन गोवंश हा बाहेरील देशातून दुग्ध उत्पादन वाढीसाठी आयात केलेला असून सदर कायद्याचा परिणाम थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांवर झाला असून पशुपालकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, शिव आर्मी शेतकरी संघटनेचे दत्ता ढगे, शेतकरी संघटनेचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, शिव आर्मीचे रवी पवार ,मंगेश गुंजाळ, विकास गुंजाळ, रवींद्र आरगडे, सदाशिव हासे, रवी हासे, ऍड गोपीनाथ घुले, शेतकरी संघटनेचे सागर गिऱ्हे, अमोल गुळवे आधी पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग नोंदवला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!