‘संविधान का बदलावे’ पुस्तकाच्या लेखक व आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा;सर्वपक्षांची मागणी

श्रीरामपूर –
संविधान का बदलावे या पुस्तकाचे लेखक व त्या पुस्तकाच्या प्रकाशन  सोळाव्यास उपस्थित राहणाऱ्या आयोजकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मेढे निरीक्षक यांना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या “संविधान का बदलावे” या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखक व प्रकाशन सोहळ्याचे आयोजक यांच्यावर देशद्रोह (IPC कलम 124A) व इतर प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची  मागणी  करण्यात आली आहे.
दिनांक 26 जुलै 2025 रोजी नवी पेठ, पुणे येथील पत्रकार भवन येथे ॲड. शिवाजी कोकणे लिखित “संविधान का बदलावे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय संविधानाबद्दल अवमानकारक वक्तव्ये करण्यात आली तसेच संविधानाबाबत चुकीचा अपप्रचार पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला  आहे त्या दोषींवर देशद्रोहाचा पुन्हा दाखल  करून कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात स्वरूपाचे मोठमोठे आंदोलन होतील याची सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. यावेळी राहुल शहाणे, एजाज पठाण,विशाल सुरडकर, अमोल काळे, विलास जाधव, श्रीराम निकुंभ, विशाल थोरात, आशिष मोरे, गणेश पालकर, गौस तांबोळी,योगेश जाधव, दादासाहेब बनकर, रमेश ढाकणे, अमित कुसुमकर,जावेद अत्तार, अविनाश सुपेकर,ताया शिंदे, प्रदीप निकुंभ, बिलाल आतार, मोजेस चक्रनारायण आधी उपस्थित होते.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मेढे निरीक्षक यांना देण्यात आले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News