‘संविधान का बदलावे’ पुस्तकाच्या लेखक व आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा;सर्वपक्षांची मागणी

श्रीरामपूर –संविधान का बदलावे या पुस्तकाचे लेखक व त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोळाव्यास उपस्थित राहणाऱ्या आयोजकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे...

श्रीरामपूर –
संविधान का बदलावे या पुस्तकाचे लेखक व त्या पुस्तकाच्या प्रकाशन  सोळाव्यास उपस्थित राहणाऱ्या आयोजकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मेढे निरीक्षक यांना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या “संविधान का बदलावे” या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखक व प्रकाशन सोहळ्याचे आयोजक यांच्यावर देशद्रोह (IPC कलम 124A) व इतर प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची  मागणी  करण्यात आली आहे.
दिनांक 26 जुलै 2025 रोजी नवी पेठ, पुणे येथील पत्रकार भवन येथे ॲड. शिवाजी कोकणे लिखित “संविधान का बदलावे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय संविधानाबद्दल अवमानकारक वक्तव्ये करण्यात आली तसेच संविधानाबाबत चुकीचा अपप्रचार पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला  आहे त्या दोषींवर देशद्रोहाचा पुन्हा दाखल  करून कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात स्वरूपाचे मोठमोठे आंदोलन होतील याची सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. यावेळी राहुल शहाणे, एजाज पठाण,विशाल सुरडकर, अमोल काळे, विलास जाधव, श्रीराम निकुंभ, विशाल थोरात, आशिष मोरे, गणेश पालकर, गौस तांबोळी,योगेश जाधव, दादासाहेब बनकर, रमेश ढाकणे, अमित कुसुमकर,जावेद अत्तार, अविनाश सुपेकर,ताया शिंदे, प्रदीप निकुंभ, बिलाल आतार, मोजेस चक्रनारायण आधी उपस्थित होते.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मेढे निरीक्षक यांना देण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!