सराईत गुन्हेगारास सिनेस्टाईल पाठलाग करून गावठी कट्टयांसह पकडले;नेवासा पोलिसांनी केली कारवाई

श्रीरामपूर-
नेवासा पोलिसांना मंगळवार दि. 29 जुलै रोजी पहाटे भेंडा फॅक्टरी जवळ दोन संशयित मोटरसायकलवर वेगात जाताना दिसून आले. दोघांपैकी एक जण हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्या दोघा जणांना नांदूर शिकारी गावाजवळ गावठी कट्टयांसह जेरबंद केले.दोघांविरोधात भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर हकीकत अशी की, मंगळवार दि. 29 जुलै रोजी पहाटे नेवासा पोलिसांचे पोलीस वाहन पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ व चालक संतोष खंडागळे  रात्रगस्त करीत असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भेंडा फॅक्टरी जवळ दोन संशयित मोटर सायकलवर वेगात जाताना दिसून आले. रात्रगस्तवरील पोलिस वाघ व खंडागळे यांना संशय आल्याने त्यांनी मोटर सायकल थांबवण्याचा प्रयत्न केला असता कट मारून मोटर सायकल चालक कुकाण्याकडे वेगाने निघून गेला. त्यावेळी असं लक्षात आले की दोघांपैकी एक जण हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्यानंतर तातडीने नाकाबंदी सुरू करून रात्रगस्तवरील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना नांदूर शिकारी गावाजवळ पकडले.

दोघांकडे चौकशी केली असता सचिन रमेश पन्हाळे, वय 25 वर्ष व आदित्य संतोष जाधव,वय 21 वर्ष,दोन्ही राहणार शेवगाव असे त्यांनी आपली नावे सांगितली. पाठलाग करीत असताना दोघांनी हातातून काही तरी फेकल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता काहीही फेकले नाही असे सुरुवातीला त्यांनी सांगितले. परंतु पोलीसी खाक्या दाखवताच दोन गावठी कट्टे फेकल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शोध घेतला असता दोन देशी कट्टे मिळून आले. सदर कट्ट्या बाबत विचारपूस केली असता सदरचे कट्टे मध्यप्रदेश येथून आजच खरेदी करून आणल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीकडून 20 हजार रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यांसह एक टीव्हीएस स्टार मोटर सायकल, दोन मोबाईल असा एकूण 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत दोन्ही आरोपींवर पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे नेवासा येथील पोलीस हवालदार शहाजी आंधळे हे करीत आहेत.सचिन पन्हाळे यांच्यावर यापूर्वी पोलीस ठाणे शेवगाव, एमआयडीसी व नेवासा येथे दंगल घडवुन आणणे, अग्नीशस्त्र बाळगणे, जंगली प्राण्यांची तस्करी करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत. सचिन पन्हाळे यास मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अग्नीशस्त्र हवेत मिरवताना नेवासा पोलिसांनी रंगेहात पकडले होते. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पोलीस रिमांडकामी आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे, पोलीस हवलदार शहाजी आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष खंडागळे, वाल्मीक वाघ, नारायण डमाळे, वासुदेव डमाळे व गणेश जाधव यांनी केली आहे.

Leave a Comment

संबंधित बातम्या

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

Latest News

Trending News