डॉ.आंबेडकर पुतळा स्मारक जागेचे काम ८ दिवसांत मार्गी लावा;पालकमंत्री विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश

श्रीरामपूर –श्रीरामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या जागेचे काम ८ दिवसांत पूर्ण करून ते तातडीने महसूलमंत्र्यांकडे...

श्रीरामपूर –
श्रीरामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या जागेचे काम ८ दिवसांत पूर्ण करून ते तातडीने महसूलमंत्र्यांकडे पाठवावे, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. बुधवार दि.२३ जुलै रोजी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, प्रांताधिकारी किरण सावंत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपवनसंरक्षक साली विठ्ठल, उपअधीक्षक भूमिअभिलेख रवींद्र खराटे, जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाचे अधीक्षक जितेंद्र भिंगारदिवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्षे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अहिल्यानगर येथील आढावा बैठकीत बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

पालकमंत्री विखे पाटील यांनी बैठकीत सांगितले की,
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा विषय प्रलंबित आहे. आता हे काम अधिक विलंब न करता आठ दिवसांत मार्गी लागले पाहिजे.स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की, ही जागा वनविभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अनेक अडचणी आल्या. मात्र त्या अडचणींवर मात करून सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा केली असून आता या ऐतिहासिक स्मारकाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. हे काम माझ्या हातून घडत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच माझ्या कामाला खासदार सुजय विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच इतक्या दिवस झोपी गेलेल्या काँग्रेस पक्षाने आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा करणे बंद करावे. सत्ता भाजपाची आहे. हे काम पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेते मंडळींनी आपला देखावा बंद करावा,असेही त्रिभुवन यांनी म्हटले आहे.

इतक्या दिवस झोपी गेलेल्या काँग्रेस पक्षाने आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा करणे बंद करावे. सत्ता भाजपाची आहे. हे काम पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेते मंडळींनी आपला देखावा बंद करावा,असेही सुभाष त्रिभुवन यांनी म्हटले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!