डॉ.आंबेडकर पुतळा स्मारक जागेचे काम ८ दिवसांत मार्गी लावा;पालकमंत्री विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश

श्रीरामपूर –
श्रीरामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या जागेचे काम ८ दिवसांत पूर्ण करून ते तातडीने महसूलमंत्र्यांकडे पाठवावे, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. बुधवार दि.२३ जुलै रोजी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, प्रांताधिकारी किरण सावंत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपवनसंरक्षक साली विठ्ठल, उपअधीक्षक भूमिअभिलेख रवींद्र खराटे, जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाचे अधीक्षक जितेंद्र भिंगारदिवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्षे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अहिल्यानगर येथील आढावा बैठकीत बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

पालकमंत्री विखे पाटील यांनी बैठकीत सांगितले की,
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा विषय प्रलंबित आहे. आता हे काम अधिक विलंब न करता आठ दिवसांत मार्गी लागले पाहिजे.स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की, ही जागा वनविभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अनेक अडचणी आल्या. मात्र त्या अडचणींवर मात करून सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा केली असून आता या ऐतिहासिक स्मारकाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. हे काम माझ्या हातून घडत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच माझ्या कामाला खासदार सुजय विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच इतक्या दिवस झोपी गेलेल्या काँग्रेस पक्षाने आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा करणे बंद करावे. सत्ता भाजपाची आहे. हे काम पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेते मंडळींनी आपला देखावा बंद करावा,असेही त्रिभुवन यांनी म्हटले आहे.

इतक्या दिवस झोपी गेलेल्या काँग्रेस पक्षाने आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा करणे बंद करावे. सत्ता भाजपाची आहे. हे काम पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेते मंडळींनी आपला देखावा बंद करावा,असेही सुभाष त्रिभुवन यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News