डॉ.आंबेडकर पुतळा स्मारक जागेचे काम ८ दिवसांत मार्गी लावा;पालकमंत्री विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश

श्रीरामपूर –श्रीरामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या जागेचे काम ८ दिवसांत पूर्ण करून ते तातडीने महसूलमंत्र्यांकडे...

श्रीरामपूर –
श्रीरामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या जागेचे काम ८ दिवसांत पूर्ण करून ते तातडीने महसूलमंत्र्यांकडे पाठवावे, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. बुधवार दि.२३ जुलै रोजी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, प्रांताधिकारी किरण सावंत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपवनसंरक्षक साली विठ्ठल, उपअधीक्षक भूमिअभिलेख रवींद्र खराटे, जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाचे अधीक्षक जितेंद्र भिंगारदिवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्षे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अहिल्यानगर येथील आढावा बैठकीत बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

पालकमंत्री विखे पाटील यांनी बैठकीत सांगितले की,
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा विषय प्रलंबित आहे. आता हे काम अधिक विलंब न करता आठ दिवसांत मार्गी लागले पाहिजे.स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की, ही जागा वनविभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अनेक अडचणी आल्या. मात्र त्या अडचणींवर मात करून सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा केली असून आता या ऐतिहासिक स्मारकाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. हे काम माझ्या हातून घडत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच माझ्या कामाला खासदार सुजय विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच इतक्या दिवस झोपी गेलेल्या काँग्रेस पक्षाने आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा करणे बंद करावे. सत्ता भाजपाची आहे. हे काम पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेते मंडळींनी आपला देखावा बंद करावा,असेही त्रिभुवन यांनी म्हटले आहे.

इतक्या दिवस झोपी गेलेल्या काँग्रेस पक्षाने आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा करणे बंद करावे. सत्ता भाजपाची आहे. हे काम पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेते मंडळींनी आपला देखावा बंद करावा,असेही सुभाष त्रिभुवन यांनी म्हटले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!