शिर्डीचे साई मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ई-मेलद्वारे धमकी; प्रशासन सतर्क;पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

श्रीरामपूर –
देश विदेशातल्या साईभक्तांच्या अलोट गर्दीने फुललेले
शिर्डीतील साईबाबा मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी ई मेलद्वारे प्रशासनाला आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साई बाबा मंदिर ट्रस्टने या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ई-मेलमध्ये मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटक ठेवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, मंदिर परिसरात तपासणी करत आहेत.शिर्डीच्या साईं मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. देशाबरोबरच परदेशातूनही लोक साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. त्यामुळे येथे सुरक्षेची चोख व्यवस्था असते. शिर्डीत साईभक्तांची नेहमीच मोठी गर्दी असते. दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांना तपासणीनंतरच प्रवेश दिला जातो. दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारावर साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी पुरुष आणि महिला दोघांचीही कडक तपासणी करतात. अशात मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने पोलिस आणि प्रशासन तपास कार्यात लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवंत मान नावाच्या व्यक्तीने शिर्डीच्या साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव ईमेल आयडीवरून समोर आले आहे. धमकीचा ईमेल मिळताच शिर्डी साईबाबा मंदिर ट्रस्टने तातडीने स्थानिक शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. bhagvanthmannyandex.com या ईमेल आयडीवरून भागवत मान नावाच्या व्यक्तीने धमकी दिली आहे. साई मंदिर समाधी स्थळ आणि द्वारकामाईमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.सध्या शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धमकी कोठून आली? ती खरी की खोटी? याचा तपशीलवार शोध घेतला जात आहे. संपूर्ण मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ई-मेलमध्ये मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटक ठेवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, मंदिर परिसरात तपासणी करत आहेत.

Leave a Comment

संबंधित बातम्या

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

Latest News

Trending News