योजनांच्‍या अंमलबजावणीत जिल्‍हा राज्‍यात अग्रस्‍थानी-पालकमंत्री विखे पाटील;नव्‍याने रुजु झालेले आणि बदलून गेलेल्‍या आधि‍का-यांचा सन्‍मान सोहळा

श्रीरामपूर-
योजनांच्‍या अंमलबजावणीत अहिल्‍यानगर जिल्‍हा राज्‍यात अग्रस्‍थानी राहीला.भविष्‍यातही जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेचा वेग कायम राहण्‍यासाठी सुसंवादाने अधिक चांगले काम करण्‍याची अपेक्षा जिल्‍ह्याच्‍या विकासाचे व्‍हीजन डॉक्‍युमेंट तयार करण्‍याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये नव्‍याने रुजु झालेले तसेच बदलून गेलेल्‍या आधि‍का-यांचा सन्‍मान सोहळा मंत्री विखे पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाला. या निमित्‍ताने आयोजित केलेल्‍या स्‍नेहसंवाद मेळाव्‍यात त्‍यांनी जिल्‍ह्यात विकास प्रक्रीयेची सुरु असलेली वाटचाल तसेच अगामी काळात जिल्‍ह्याच्या विकासाचे उदिष्‍ठ पुर्ण करण्‍यासाठी कराव्‍या लागणा-या निर्णयांची माहीती त्‍यांनी दिली.या प्रसंगी आ.विठ्ठलराव लंघे,आ.विक्रमसिंह पाचपुते, साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरीक्त जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर, अतिरीक्त पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, आयुक्त यशवंत डांगे, शिर्डी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील पुढे म्‍हणाले की, शासन आपल्‍या दारी उपक्रमातून सुमारे २५ लाख लाभार्थ्‍यांना विविध शासकीय दाखले देता आले. लाडकी बहीण योजनेची सुमारे १३ लाख महिलांनी केलेली नोंदणी, घरकुल योजनेची यशस्‍वी अंमलबजावणी यांसह अन्‍य विभागांनीही त्‍यांच्या स्‍तरावर केलेल्‍या यशस्‍वी कामगिरीमुळे राज्‍यात अहिल्‍यानगर जिल्‍हा अग्रेसर राहीला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत निळवंडे धरणाचे लोकार्पण आणि शासन आपल्‍या दारी उपक्रमाच्‍या समारोप कार्यक्रमाची आठवण सांगताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, त्‍याच दिवशी राज्‍यात आरक्षणाच्‍या मागणीवरुन आंदोलने सुरु होती. या तणावाच्‍या परिस्थितीत कार्यक्रम कसा होणार असा प्रश्‍न सर्वांच्‍याच समोर होता. परंतू आधिका-यांचे सहकार्य आणि नागरीकांनी दाखविलेल्‍या उपस्थितीमुळे हा ऐतिहासिक कार्यक्रम होवू शकला,असे ना. विखे पाटील म्हणाले.याप्रसंगी जिल्‍हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सध्‍या जिल्‍ह्यात प्रशासनाकडून सुरु असलेल्‍या विकास कामांबाबत माहीती दिली. साखर आयुक्‍त सिध्‍दराम सालीमठ यांनी मंत्री विखे पाटील यांच्‍या प्रशासनाशी असलेल्‍या सुसंवादाचे कौतूक करुन, या जिल्‍ह्यामध्‍ये विकासाच्‍या खुप संधी आहेत. विकासाचा विचार करुन, काम करणारे नेतृत्‍व आहे.माझ्या ३२ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत अनेक जिल्ह्यात काम केले पण असा अधिकारी वर्गाचा सन्मान प्रथमच अनुभवता आला. विखे पाटील परिवाराच्‍या वतीने सर्व आधिका-यांचा सन्‍मान करण्‍यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये नव्‍याने रुजु झालेले तसेच बदलून गेलेल्‍या आधि‍का-यांचा सन्‍मान सोहळ्यात मार्गदर्शन करताना पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News