‘अशोक’ दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव संस्था-मा.आ.कांबळे; डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजचे उद्घाटन संपन्न

श्रीरामपूर- दर्जेदार शैक्षणिक संधी आपल्या ग्रामीण भागात उपलब्ध करण्यासाठी ‘अशोक’ कायम प्रयत्नशील आहे. नावारूपास आलेली ही संस्था पदवीचे परिपूर्ण शिक्षण देण्यास...

श्रीरामपूर-  
दर्जेदार शैक्षणिक संधी आपल्या ग्रामीण भागात  उपलब्ध करण्यासाठी ‘अशोक’ कायम प्रयत्नशील आहे. नावारूपास आलेली ही संस्था पदवीचे परिपूर्ण शिक्षण देण्यास तत्पर असल्याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी केले.
अशोक सहकारी साखर कारखाना संचलित अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी पदवी) चा उद्घाटन समारंभ माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनराध्यक्ष संजय छल्लारे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, अशोक कारखान्याचे विद्यमान व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक, माजी व्हा. चेअरमन हिम्मतराव धुमाळ, माजी चेअरमन सुरेश गलांडे, ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात,  माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके,  कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, संचालक ज्ञानेश्वर काळे, प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्वर शिंदे, आदिनाथ झुराळे, माजी संचालक काशिनाथ गोराणे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात माजी आ.श्री. कांबळे पुढे म्हणाले की, बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला तांत्रिक व्यवसायिक शिक्षणाची जोड देण्याकरीता संस्थेचे संस्थापक भानुदास मुरकुटे यांनी या अशोक कारखान्यामार्फत शैक्षणिक संकुलाची उभारणी केली आहे. याप्रसंगी श्री. छल्लारे यांनी सांगितले की, चांगले दर्जाचे उच्च शिक्षण, तंत्र शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठीच्या प्रयत्नांमध्ये श्री. मुरकुटे यांनी कोणतीही कसर सोडली नाही. ज्यामुळे तांत्रिक शिक्षणाच्या दर्जा सुधारण्यात झालेली फलनिष्पत्ती दिसून येते.माजी आ.श्री.मुरकुटे म्हणाले की, तांत्रिक शिक्षण हा पदविका आणि पदवी अभ्यासक्रम हे माध्यम शिक्षणाच्या प्रवाहातील बहुस्वीकृत मार्ग आहे. या अशोकच्या संस्थामध्ये पायाभूत सुविधा, मूलभूत शिक्षण, व्यावसायिक ज्ञान व उच्च स्तरावर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, भविष्यात पात्र व सक्षम अभियंते निर्माण करणे हे अशोकचे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे सहसचिव विरेश गलांडे यांनी केले. या कार्यक्रमास  सिद्धार्थ मुरकुटे,  दत्तात्रय नाईक, संचालक ज्ञानदेव पटारे, रामभाऊ कसार, अमोल कोकणे, निरज मुरकुटे, अच्युतराव बडाख, मयूर पटारे, आदींसह पालक, सभासद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार डॉ. मोहितकुमार गायकवाड यांनी मानले. सूत्रसंचालन अरुण कडू व दिलीप खंडागळे यांनी केले. कार्यक्रमास पॉलिटेक्निकचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी पदवी) च्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना माजी आ. भाऊसाहेब कांबळे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!