पत्ते खेळणारे कृषी मंत्री कोकाटेंची हकालपट्टी करा;राष्ट्रवादीच्या गुंडांवर कारवाईसाठी छावा संघटनेचे निवेदन

श्रीरामपूर-
विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी करावी तसेच लातूर येथील छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली आज छावा संघटनेने श्रीरंप उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध केला आहे.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर येथे राष्ट्रवादी प्रदेशअध्यक्ष यांना निवेदन देण्यासाठी जमलेल्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक चा सुरज चव्हाण व त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी (मोकोका) कायद्या अंतर्गत कारवाई करावी.तसेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम मानहानीकारक वक्तव्य करणाऱ्या या कोकाटे ची मानसिक स्थिती तपासावी आणि आरामासाठी त्यांना पत्ते खेळण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र केबिन बनून द्यावी,
निवेदनावर नितीन पटारे पाटील (जिल्हाध्यक्ष) यांच्यासह शरद बोंबले पाटील (शहर अध्यक्ष) अक्षय पटारे, गोरख शेजुळ, राजू भिंगारे, निलेश बनकर, भाऊ गुंजाळ, प्रदीप पटारे, विजय सालालकर, बाबासाहेब भनगे, राहुल तारख, मयुर पटारे, दादा शेजुळ, रोहन पटारे, दिलीप भागडे, अमोल शितोळे , विशाल पटारे, सतीश बेल्हेकर, रोहित उंडे, विकास उंडे आदींची नावे आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली आज छावा संघटनेने श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News