डॉ.आंबेडकर पूर्णकृती पुतळ्याच्या जागेचे रेखांकन करा;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;आ.ओगले यांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागे संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हाधिकारी पकंज आशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने वन आणि भुमिअभिलेख विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना करत डी फॉरेस्ट नोटिफिकेशन नुसार वनविभाग आणि भूमी अभिलेख यांनी जागेवर प्रत्यक्षात पाहणी करुन त्याबाबतचे नकाशे तयार करण्यास सांगितले. तसेच दोन्ही विभागांना पत्र देण्याबाबत उपजिल्हाधिकारी, महसूल विभागालाही आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी आमदार हेमंत ओगले म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णकृति पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून तयार आहे. फक्त वनविभागाच्या ना- हरकत प्रमाणपत्र करीता सदर विषय प्रलंबित राहिला आहे. आता जिल्हाधिकारी यांनीच याबाबत आदेश दिल्यामुळे लवकरच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णकृती पुतळ्याचा प्रश्न  मार्गी लागणार आहे.सदर बैठकीकरिता जिल्हा बँक संचालक करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले,  श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, वन विभाग आणि भूमी अभिलेख विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष संदिप मगर, दत्तनगरचे सरपंच प्रेमचंद कुंकूलोळ, माजी सरपंच सुनील शिरसाठ, नगरसेवक कलीम कुरेशी, शंकरराव गायकवाड, युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत ओगले, निलेश नागले,अशोक लोंढे, सुहास राठोड, मोहन आव्हाड, सुनील मगर, रितेश एडके, मच्छिंद्र ढोकणे, मनोज काळे, वैभव पंडित, सुरेश ठुबे, किरण खंडागळे, सुरेश बनसोडे, सोमनाथ पटाईत, अतुल काळे, यांच्यासह आदीही उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागे संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हाधिकारी पकंज आशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News