माळवडगाव येथे  ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार’ पक्षाच्या शाखेचे उद्घाटन

माळवडगाव-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार लहुजी कानडे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार लहुजी कानडे मित्रमंडळ, माळवाडगाव यांच्या वतीने ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार’ या पक्षाच्या शाखेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले.यानिमित्त माजी आमदार लहुजी कानडे लिखित ‘चिंतन’ या पुस्तकाचा संग्रह कार्यकर्त्यांना तसेच हायस्कूलच्या वाचनालयास भेट म्हणून देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार लहुजी कानडे मित्रमंडळ, माळवाडगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २२ ते ३० जुलैदरम्यान “विजय संकल्प सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात व प्रभागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो असलेले स्वागत फलक लावले जात आहेत.वाढदिवसानिमित्त विविध विधायक कार्यक्रम घेऊन एक महिला व एक युवक कार्यकर्त्यास पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने माळवाडगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या नेत्याच्या वाढदिवसाचे हे औचित्य साधून संघटन मजबूत व्हावे, हा हेतू यामागे असून पक्ष संघटना बळकटीकरणसाठी या उपक्रमाचा लाभ होईल,असेही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

माजी आमदार लहुजी कानडे मित्रमंडळ, माळवाडगाव यांच्या वतीने ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार’ या पक्षाच्या शाखेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News