आकारी पडित शेतकऱ्यांच्याजमीनी पुन्‍हा मिळाव्‍यात यासाठी मान्‍यता द्या;ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या नेतृत्‍वाखालील शिष्‍टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

श्रीरामपूर-खंडकरी शेतक-यांप्रमाणेच आकारी पडित शेतकऱ्यांच्याहरेगाव मळ्यातील जमीनी शेतक-यांना पुन्‍हा मिळाव्‍यात यासाठी मान्‍यता देण्‍याची विनंती शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाम‍हीम राज्‍यपाल डॉ.सी.पी राधाकृष्‍णन् यांना...

श्रीरामपूर-
खंडकरी शेतक-यांप्रमाणेच आकारी पडित शेतकऱ्यांच्या
हरेगाव मळ्यातील जमीनी शेतक-यांना पुन्‍हा मिळाव्‍यात यासाठी मान्‍यता देण्‍याची विनंती शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाम‍हीम राज्‍यपाल डॉ.सी.पी राधाकृष्‍णन् यांना केली. जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या नेतृत्‍वाखाली शेतक-यांच्‍या शिष्‍टमंडळाने राजभवन येथे त्‍यांची भेट घेतली.आकारी पडित शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या बराबेर सविस्तर चर्चा केली.
या जमीनी शेतक-यांना पुन्‍हा मिळाव्‍यात यासाठी तत्‍कालिन महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यातून महायुती सरकारने विधानसभा निवडणूकी पुर्वी मंत्रीमंडळात निर्णय घेवून, या संदर्भातील कायद्याच्‍या सुधारणेला दिनांक २३ सप्‍टेंबर २०२४ रोजी मान्‍यता दिली होती. मंत्रीमंडळाच्‍या मान्‍यतेनंतर कायद्यातील सुधारणेचा अध्‍यादेश मा.राज्‍यपालांच्‍या मान्‍यतेसाठी पाठविण्‍यात आला होता. परंतू १५ ऑक्‍टोंबर २०२४ पासून विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागल्‍यामुळे या अध्‍यादेशाला मान्‍यता मिळू शकलेली नव्‍हती.
या संदर्भात जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी  मुख्‍यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याकडेही सातत्‍याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्‍यानुसार जलसंपदा मंत्री ना.विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली शेतक-यांच्‍या शिष्‍टमंडळाने राजभवनात राज्‍यपाल डॉ.सी.पी राधाकृष्‍णन् यांची भेट घेवून  मान्‍यता देण्‍याची विनंती केली. सन १९१८ साली तेव्‍हाच्‍या नेवासा तालुक्‍यातील ३ गावे व कोपरगाव तालुक्‍यातील ६ गावे आणि सध्‍याच्‍या श्रीरामपूर तालुक्‍यातील ९ गावांमधील ७ हजार ३७७ एकर जमीन इंग्रज शाससनाने ताब्‍यात घेवून १९३४ साली या गावातील ताब्‍यात घेतलेल्‍या  क्षेत्राला महसूल गावांचा दर्जा दिला होता. सन २०१२ साली इंग्रज सरकारने ताब्‍यात घेतलेल्‍या जमीनी खंडकरी शेतक-यांना परत करण्‍याचा ऐतिहासिक निर्णय झाला मात्र हरेगाव मळ्यातील जमीनी त्‍याच पध्‍दतीने पुन्‍हा मिळाव्‍यात म्‍हणून वेळोवेळी सादर करण्‍यात आलेले प्रस्‍ताव १९१८ रोजी राजपत्रात असलेल्‍या तरतुदीमुळे फेटाळण्‍यात येत होते.हीच बाब विचारात घेवून खंडकरी शेतक-यांप्रमाणे हरेगाव मळ्यातील शेतक-यांना जमीन वाटप करता येईल किंवा कसे याबाबत राज्‍याचे महाअधिवक्‍ता यांचे अभिप्राय घेवून महायुती सरकारने न्‍यायालयात सुध्‍दा वेळोवेळी आपली बाजू मांडली होती.आज राज्यपाल यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने त्यांना जमीन वाटपासाठी मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे.यावेळी नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत शेतकरी संघटनेचे नेते
ॲड.अजित काळे,याचिकाकर्ते गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे,भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,डॉ शंकरराव मुठे,गोविंद वाघ, बाळासाहेब बकाल,शरद आसने, संपतराव मुठे, डॉ.दादासाहेब आदिक, सचिन वेताळ,सोपान नाईक,सुनिल आसने, बबनराव नाईक, बाबासाहेब वेताळ आदीसह अधिकारी सचिव उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या नेतृत्‍वाखाली आकारी पडीत शेतक-यांच्‍या शिष्‍टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल डॉ.सी.पी राधाकृष्‍णन यांची भेट घेतली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!