आकारी पडित शेतकऱ्यांच्याजमीनी पुन्‍हा मिळाव्‍यात यासाठी मान्‍यता द्या;ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या नेतृत्‍वाखालील शिष्‍टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

श्रीरामपूर-
खंडकरी शेतक-यांप्रमाणेच आकारी पडित शेतकऱ्यांच्या
हरेगाव मळ्यातील जमीनी शेतक-यांना पुन्‍हा मिळाव्‍यात यासाठी मान्‍यता देण्‍याची विनंती शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाम‍हीम राज्‍यपाल डॉ.सी.पी राधाकृष्‍णन् यांना केली. जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या नेतृत्‍वाखाली शेतक-यांच्‍या शिष्‍टमंडळाने राजभवन येथे त्‍यांची भेट घेतली.आकारी पडित शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या बराबेर सविस्तर चर्चा केली.
या जमीनी शेतक-यांना पुन्‍हा मिळाव्‍यात यासाठी तत्‍कालिन महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यातून महायुती सरकारने विधानसभा निवडणूकी पुर्वी मंत्रीमंडळात निर्णय घेवून, या संदर्भातील कायद्याच्‍या सुधारणेला दिनांक २३ सप्‍टेंबर २०२४ रोजी मान्‍यता दिली होती. मंत्रीमंडळाच्‍या मान्‍यतेनंतर कायद्यातील सुधारणेचा अध्‍यादेश मा.राज्‍यपालांच्‍या मान्‍यतेसाठी पाठविण्‍यात आला होता. परंतू १५ ऑक्‍टोंबर २०२४ पासून विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागल्‍यामुळे या अध्‍यादेशाला मान्‍यता मिळू शकलेली नव्‍हती.
या संदर्भात जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी  मुख्‍यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याकडेही सातत्‍याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्‍यानुसार जलसंपदा मंत्री ना.विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली शेतक-यांच्‍या शिष्‍टमंडळाने राजभवनात राज्‍यपाल डॉ.सी.पी राधाकृष्‍णन् यांची भेट घेवून  मान्‍यता देण्‍याची विनंती केली. सन १९१८ साली तेव्‍हाच्‍या नेवासा तालुक्‍यातील ३ गावे व कोपरगाव तालुक्‍यातील ६ गावे आणि सध्‍याच्‍या श्रीरामपूर तालुक्‍यातील ९ गावांमधील ७ हजार ३७७ एकर जमीन इंग्रज शाससनाने ताब्‍यात घेवून १९३४ साली या गावातील ताब्‍यात घेतलेल्‍या  क्षेत्राला महसूल गावांचा दर्जा दिला होता. सन २०१२ साली इंग्रज सरकारने ताब्‍यात घेतलेल्‍या जमीनी खंडकरी शेतक-यांना परत करण्‍याचा ऐतिहासिक निर्णय झाला मात्र हरेगाव मळ्यातील जमीनी त्‍याच पध्‍दतीने पुन्‍हा मिळाव्‍यात म्‍हणून वेळोवेळी सादर करण्‍यात आलेले प्रस्‍ताव १९१८ रोजी राजपत्रात असलेल्‍या तरतुदीमुळे फेटाळण्‍यात येत होते.हीच बाब विचारात घेवून खंडकरी शेतक-यांप्रमाणे हरेगाव मळ्यातील शेतक-यांना जमीन वाटप करता येईल किंवा कसे याबाबत राज्‍याचे महाअधिवक्‍ता यांचे अभिप्राय घेवून महायुती सरकारने न्‍यायालयात सुध्‍दा वेळोवेळी आपली बाजू मांडली होती.आज राज्यपाल यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने त्यांना जमीन वाटपासाठी मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे.यावेळी नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत शेतकरी संघटनेचे नेते
ॲड.अजित काळे,याचिकाकर्ते गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे,भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,डॉ शंकरराव मुठे,गोविंद वाघ, बाळासाहेब बकाल,शरद आसने, संपतराव मुठे, डॉ.दादासाहेब आदिक, सचिन वेताळ,सोपान नाईक,सुनिल आसने, बबनराव नाईक, बाबासाहेब वेताळ आदीसह अधिकारी सचिव उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या नेतृत्‍वाखाली आकारी पडीत शेतक-यांच्‍या शिष्‍टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल डॉ.सी.पी राधाकृष्‍णन यांची भेट घेतली.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News