मोतिबिंदू शिबिराच्या उपक्रमाची शतकपूर्ती;बेलापूर येथील भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपने जपले सामाजिक भान

श्रीरामपूर-
तालुक्यातील बेलापूर येथील भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुणे येथील के. के. आय (बुधरानी) हॉस्पीटल, डॉ. काळे हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित मोतिबिंदू शिबिराच्या उपक्रमाने शतक पूर्ण केल्याबद्दल नुकतेच शतकपूर्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपने बुधरानी हॉस्पिटलच्या सहकार्याने तसेच डॉ. सुधीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ वर्षांपूर्वी सन २०१६ मध्ये मोतीबिंदू तपासणी शिबिराच्या उपक्रमास प्रारंभ केला. या शिबिरात ज्या रुग्णांचे मोतीबिंदू निदान होईल. त्यांच्यावर पुणे येथील बुधरानी हॉस्पीटल येथे शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येतात. आजवर हजारो गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.

बेलापूर येथील भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोतिबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचे शंभरावे शिबिर बेलापूर मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. संपदा सुधीर काळे यांच्या हस्ते तसेच भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे, डॉ. सुधीर काळे, भगिरथ मुंडलिक, गिरीश परांजपे, बाबासाहेब अमोलिक, बुधरानी हॉस्पीटलच्या मनिषा कोरडे आदींच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. यावेळी अभिषेक खंडागळे यांनी सदरच्या उपक्रमाच्या शातकपूर्तीचे श्रेय स्वस्तिक ग्रुपचे सदस्य डॉ. सुधीर व डॉ. संपदा काळे, बुधरानी हॉस्पीटल यांना दिले. तसेच यापुढेही हा उपक्रम राबविला जाईल, असे सांगितले. गेली नऊ वर्षे सातत्य राखून मोतीबिंदू शिबिराची शतकपूर्ती केल्याबद्दल अनेकांनी खंडागळे परिवार, स्वस्तिक ग्रुप, डॉ. काळे परिवार तसेच बुधरानी हॉस्पीटलच्या संचालकांचे कौतुक केले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News