श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील गट नं.७८ व ७९ या जागेसंबंधी सुरू असलेल्या वादाबाबत नाशिकच्या अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी त्यांच्यासमोर केलेले अपील फेटाळून लावत अहिल्यानगर अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश कायम ठेवल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे सदर जागा ही नानासाहेब गलांडे यांचीच असल्याचे या निकालावरून सिद्ध झाले आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, उंदीरगाव येथील गट. नं.७८ व ७९ या जागे संबंधित २०२० पासून वाद सुरु आहे. यावरून अनेक आरोप, प्रत्यारोप करण्यात आले.अहमदनगर यांचेकडील आदेश आरटीएस अपील क्र. ३६९/२०२१ दि. ०३/०३/२०२३, नंतर विभागीय आयुक्त, नाशिक यांचे न्यायालयामध्ये आर.टी.एस. / अपील /पुनरिक्षण/७७९/२०२३ सामनेवाले यांनी अर्ज केला असता तो अर्ज ०२/०७/२०२५ रोजी फेटाळून लावत नानासाहेब गलांडे यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे.अशोक विठ्ठल बांद्रे, विठ्ठल किसन बांद्रे, राजेंद्र पांडुरंग बांद्रे, द्वारकाबाई अंबादास शिरसागर, राजू शब्बीर मणियार, सर्व रा. उंदीरगाव या सर्वांनी नानासाहेब काशिनाथ गलांडे यांच्या विरोधात विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २५७ प्रमाणे अपील केले असता या वादातील मिळकत उंदीरगाव येथील गट. नं. ७९क/१८ संबंधित श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथील बाद फौजदारी वादातील फेरफार क्र ५५८६ दिनांक २०/०५/१९९५ मंजूर नोंदीचे बाबत अर्जदार यांनी विलंब क्षमापन अर्जासह उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर भाग, श्रीरामपूर यांचे न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार प्रस्तुत न्यायालयाने आरटीएस विलंब अर्ज क्र. २४१/२०२० अन्वये कामकाज चालविण्यात येवून वादातील नोंद अव्हानीत करताना सुमारे २५ वर्ष व ७ महिन्यांच्या विलंब झाल्याने दिनांक ०९/०७/२०२१ अन्वये अर्ज नामंजूर करण्यात आला होता. सदर निर्णयावर नाराज होऊन अर्जदार यांनी या अपर विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात पुनरिक्षण अर्ज दाखल केला. या संबंधित आदेशात नमूद केले आहे की हा वाद गट. क्र. ७९ बाबत असून वादातील नोंद फेरफार क्रं. ५५८६ ही गट. क्रं. ७८ बाबत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर व अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी पारीत केलेले आदेश योग्य व कायदेशीर असल्याने अर्जदार यांचे अपील नामंजूर करत अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी पारीत केलेला निकाल कायम करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
नानासाहेब गलांडे यांच्या कन्या योगिता गलांडे म्हस्के यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, संघटित होवून कोणी कितीही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो हे या प्रकरणात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांच्या निकालावरून दिसून येते. अशा प्रकारच्या निकालामुळे न्याय प्रक्रियेबाबत लोकांमध्ये विश्वास वाढण्यास निश्चित मदत होईल.
श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी
श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती
श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना
श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या
श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात