उंदिरगाव येथील जागेच्या वादात गलांडेंच्या बाजूनेच निकाल;अपर विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील गट नं.७८ व ७९ या जागेसंबंधी सुरू असलेल्या वादाबाबत नाशिकच्या अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी त्यांच्यासमोर...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील गट नं.७८ व ७९ या जागेसंबंधी सुरू असलेल्या वादाबाबत नाशिकच्या अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी त्यांच्यासमोर केलेले अपील फेटाळून लावत अहिल्यानगर अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश कायम ठेवल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे सदर जागा ही नानासाहेब गलांडे यांचीच असल्याचे या निकालावरून सिद्ध झाले आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, उंदीरगाव येथील गट. नं.७८ व ७९ या जागे संबंधित २०२० पासून वाद सुरु आहे. यावरून अनेक आरोप, प्रत्यारोप करण्यात आले.अहमदनगर यांचेकडील आदेश आरटीएस अपील क्र. ३६९/२०२१ दि. ०३/०३/२०२३, नंतर विभागीय आयुक्त, नाशिक यांचे न्यायालयामध्ये आर.टी.एस. / अपील /पुनरिक्षण/७७९/२०२३ सामनेवाले यांनी अर्ज केला असता तो अर्ज ०२/०७/२०२५ रोजी फेटाळून लावत नानासाहेब गलांडे यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे.अशोक विठ्ठल बांद्रे, विठ्ठल किसन बांद्रे, राजेंद्र पांडुरंग बांद्रे, द्वारकाबाई अंबादास शिरसागर, राजू शब्बीर मणियार, सर्व रा. उंदीरगाव या सर्वांनी नानासाहेब काशिनाथ गलांडे यांच्या विरोधात विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २५७ प्रमाणे अपील केले असता या वादातील मिळकत उंदीरगाव येथील गट. नं. ७९क/१८ संबंधित श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथील बाद फौजदारी वादातील फेरफार क्र
५५८६ दिनांक २०/०५/१९९५ मंजूर नोंदीचे बाबत अर्जदार यांनी विलंब क्षमापन अर्जासह उपविभागीय
अधिकारी, श्रीरामपूर भाग, श्रीरामपूर यांचे न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार प्रस्तुत न्यायालयाने आरटीएस विलंब अर्ज क्र. २४१/२०२० अन्वये कामकाज चालविण्यात येवून वादातील नोंद अव्हानीत करताना सुमारे २५ वर्ष व ७ महिन्यांच्या विलंब झाल्याने दिनांक ०९/०७/२०२१ अन्वये अर्ज नामंजूर करण्यात आला होता. सदर निर्णयावर नाराज होऊन अर्जदार यांनी या अपर विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात पुनरिक्षण अर्ज दाखल केला.  या संबंधित आदेशात नमूद केले आहे की हा वाद गट. क्र. ७९ बाबत असून वादातील नोंद फेरफार क्रं. ५५८६ ही गट. क्रं. ७८ बाबत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर व अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी पारीत केलेले आदेश योग्य व कायदेशीर असल्याने अर्जदार यांचे अपील नामंजूर करत अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी पारीत केलेला निकाल कायम करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

नानासाहेब गलांडे यांच्या कन्या योगिता गलांडे म्हस्के यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, संघटित होवून कोणी कितीही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो हे या प्रकरणात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांच्या निकालावरून दिसून येते. अशा प्रकारच्या निकालामुळे न्याय प्रक्रियेबाबत लोकांमध्ये विश्वास वाढण्यास निश्चित मदत होईल.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!