बीएसएनएल कंपनी नजीकच्या काळात पहिल्या क्रमांकावर दिसेल-बोरावके;श्रीरामपूर येथे रंगला सन्मान सोहळा

श्रीरामपूर-भारतीय दूरसंचार निगमच्या कारभाराबद्दल दूरध्वनीधारकांच्या असलेल्या तक्रारी व गैरसमज दूर करून उत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून ती पहिल्या क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न...

श्रीरामपूर-
भारतीय दूरसंचार निगमच्या कारभाराबद्दल दूरध्वनीधारकांच्या असलेल्या तक्रारी व गैरसमज दूर करून उत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून ती पहिल्या क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल, असे प्रतिपादन टेलिफोन निगमचे नूतन संचालक ऍड. रवींद्र बोरावके यांनी केले. श्रीरामपूर येथे माळी बोर्डींग, समता प्रतिष्ठान व अखिल भारतीय महात्मा फुले, समता परिषद आदींच्या संयुक्तीक विद्यमाने भारत संचार निगमच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल ऍड. रवींद्र बोरावके व आरोग्य मित्र, नागेबाबा परिवाराचे सदस्य सुभाषराव गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऍड. बोरावके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे होते.
याप्रसंगी आ. हेमंत ओगले, कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, श्री इम्पेक्सचे संचालक विजय कुदळे, कोपरगाव माळी बोर्डींगचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे, श्रीरामपूर माळी बोर्डींग अध्यक्ष दीपक गिरमे, विश्‍वस्त सुरेंद्रनाना गिरमे व पदाधिकारी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कुर्‍हे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत झुरंगे, विवेक गिरमे, प्राचार्य टी. ई. शेळके, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, शंकर गागरे, शिवाजीराव बारगळ, शशांक रासकर, जालिंदर कुर्‍हे, सुनील सोनवणे, बाळासाहेब हरदास, राजेंद्र सातभाई, दादासाहेब मेहेत्रे, सुभाष वाघुंडे, सचिन गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. हेमंत ओगले, करण ससाणे व सचिन गुजर आदींनी मनोगतातून ऍड. बोरावके यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक चंद्रकांत झुरंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले. तसेच विलास घोगरे, एकनाथ दुधाळ, जेष्ठ नागरीकचे लक्ष्मण निकम, एस. के. कुर्‍हे, विलास कुदळे, राऊत, सर होले, अशोक ससाणे, लक्ष्मण आगरकर, अशोक सोनवणे, किशोर ससाणे, प्रभाकर भोंगळे, ज्ञानेश्‍वर पवार, डॉ. लोंढे आदींसह श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

ऍड.रवींद्र बोरावके व सुभाषराव गायकवाड यांचा आ. हेमंत ओगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!