“विठुरायाच पावला”;आषाढ सरींमुळे खरीप पिकांना जीवदान;श्रीरामपूर तालुक्यात सोयाबीन,कपाशी,मका तरारली

श्रीरामपूर-नितीन शेळकेमे महिन्यात अवकाळी पाऊस मनसोक्त बरसून गेल्यानंतर खरीप हंगामातील पेरण्यांसाठी ज्या मान्सूनच्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता तो पाऊस...

श्रीरामपूर-नितीन शेळके
मे महिन्यात अवकाळी पाऊस मनसोक्त बरसून गेल्यानंतर खरीप हंगामातील पेरण्यांसाठी ज्या मान्सूनच्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता तो पाऊस अगदी वेळेच्या अगोदर दाखल झालाही होता.जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात जुनच्या पहिल्या आठवड्यातच सुमारे 65 टक्के पेरण्या उरकल्या.त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली.सुमारे 20 ते 25 दिवस पावसाचा मोठा खंड तालुक्यात पडला.पेरणी झालेले सोयाबीन, मका आणि कपाशी माना टाकू लागली.भंडारदरा, निळवंडे व नाशिक च्या धरण क्षेत्रात थोडा फार पाऊस सुरू होता.त्यामुळे प्रवरा व गोदावरी नद्या वेळेच्या आतच वाहत्या झाल्या.तरीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती दमदार पावसाची.अखेर आषाढी एकादशी पासून आषाढ सरी बरसणे सुरू झाले.त्यात म्हणावा असा जोर जरी नसला तरी शेतशिवारातली खरीपाची पेरण्या झालेली पिके तरारून उठली.पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजाही ‘विठुरायाच पावला’ असे म्हणत काहीसा चिंतामुक्त झाला.रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.कारण अद्यापही बहुतांशी विहिरी व बोअरवेल कोरडेठाक आहेत.तालुक्यातील बेलापूर, मातापूर, अशोकनगर, खंडाळा, निपाणी वडगाव, खोकर, भोकर,कमलपूर, भामठाण, माळवडगाव,खानापूर,टाकळीभान सह सर्वच गावांमध्ये रिमझिम स्वरूपात पाऊस गेली दोन दिवस सुरूच आहे. सध्या भंडारदरा-निळवंडे धरणातून आवर्तन सुरू करण्यात आलेले असल्याने त्याचाही फायदा तालुक्यातील पाटाखालील सिंचन क्षेत्राला होणार आहे. याव्यतिरिक्त गोदावरी आणि प्रवरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीत पाणी असल्याने त्यांचीही चिंता काही प्रमाणात मिटली आहे.जायकवाडी धरण सुमारे 55 टक्क्यांपर्यंत भरले आहे. तसेच पावसाळ्याचे अजून दोन अडीच महिने शिल्लक असल्याने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जायकवाडीला पाणी सोडावे लागण्याची चिंता असणार नाही,असे सध्यचे चित्र आहे.खरीप हंगामातील पिके सध्या जगली असली तरी खतांचे व कीटकनाशकांचे वाढलेले दर युरियाची अनुपलब्धता,लिंकिंग करून खते घेण्याची सक्ती अशा इतर प्रश्नांना शेतकऱ्यांना सध्याच्या घडीला तोंड द्यावे लागत आहे.जिल्ह्यात सर्वत्रच युरियाचा तुटवडा असल्याने शेतकरी बेजार झाला आहे.तसेच या वर्षी पासून सरकारने 1 रुपयात सुरू असलेली पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे.नव्याने सुरू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याचे चित्र आहे.31 जुलै ही या योजनेत सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत आहे.त्यामुळे अनेक सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी कमी दिसून येत आहे.

चौकट-
१) ‘ओस पडलेली कृषी केंद्र गजबजली…’
पाऊसच गायब झाल्याने तालुक्यातील कृषी केंद्र अगदी ओस पडली होती. खतांची खरेदी नाही की कीटकनाशकांना मागणी नाही,अशीच काहीशी अवस्था गेले काही दिवस दिसून येत होती.शेतकऱ्यांचा पीक व्यवस्थापनातला उत्साह हरपला होता.परंतु आता पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने आपसूकच शेतकरी पुन्हा कृषी केंद्रावर दिसू लागले आहेत.

२) ‘हवामानतज्ञांच्या नावानेही सुरू होता शिमगा’
20-25 दिवस मान्सूनच्या पावसात खंड पडला.त्यामुळे नेहमी नित्यनेमाने हवामानाचे अंदाज व्यक्त करणारेही अचानकपणे ‘गायब’ झाले. जून महिन्यात सर्वत्र धो-धो पाऊस पडणार म्हणणानाऱ्या अनेक हवामान तज्ञांच्या नावाने या काळात बोटे मोडली गेली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!