“विठुरायाच पावला”;आषाढ सरींमुळे खरीप पिकांना जीवदान;श्रीरामपूर तालुक्यात सोयाबीन,कपाशी,मका तरारली

श्रीरामपूर-नितीन शेळकेमे महिन्यात अवकाळी पाऊस मनसोक्त बरसून गेल्यानंतर खरीप हंगामातील पेरण्यांसाठी ज्या मान्सूनच्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता तो पाऊस...

श्रीरामपूर-नितीन शेळके
मे महिन्यात अवकाळी पाऊस मनसोक्त बरसून गेल्यानंतर खरीप हंगामातील पेरण्यांसाठी ज्या मान्सूनच्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता तो पाऊस अगदी वेळेच्या अगोदर दाखल झालाही होता.जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात जुनच्या पहिल्या आठवड्यातच सुमारे 65 टक्के पेरण्या उरकल्या.त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली.सुमारे 20 ते 25 दिवस पावसाचा मोठा खंड तालुक्यात पडला.पेरणी झालेले सोयाबीन, मका आणि कपाशी माना टाकू लागली.भंडारदरा, निळवंडे व नाशिक च्या धरण क्षेत्रात थोडा फार पाऊस सुरू होता.त्यामुळे प्रवरा व गोदावरी नद्या वेळेच्या आतच वाहत्या झाल्या.तरीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती दमदार पावसाची.अखेर आषाढी एकादशी पासून आषाढ सरी बरसणे सुरू झाले.त्यात म्हणावा असा जोर जरी नसला तरी शेतशिवारातली खरीपाची पेरण्या झालेली पिके तरारून उठली.पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजाही ‘विठुरायाच पावला’ असे म्हणत काहीसा चिंतामुक्त झाला.रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.कारण अद्यापही बहुतांशी विहिरी व बोअरवेल कोरडेठाक आहेत.तालुक्यातील बेलापूर, मातापूर, अशोकनगर, खंडाळा, निपाणी वडगाव, खोकर, भोकर,कमलपूर, भामठाण, माळवडगाव,खानापूर,टाकळीभान सह सर्वच गावांमध्ये रिमझिम स्वरूपात पाऊस गेली दोन दिवस सुरूच आहे. सध्या भंडारदरा-निळवंडे धरणातून आवर्तन सुरू करण्यात आलेले असल्याने त्याचाही फायदा तालुक्यातील पाटाखालील सिंचन क्षेत्राला होणार आहे. याव्यतिरिक्त गोदावरी आणि प्रवरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीत पाणी असल्याने त्यांचीही चिंता काही प्रमाणात मिटली आहे.जायकवाडी धरण सुमारे 55 टक्क्यांपर्यंत भरले आहे. तसेच पावसाळ्याचे अजून दोन अडीच महिने शिल्लक असल्याने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जायकवाडीला पाणी सोडावे लागण्याची चिंता असणार नाही,असे सध्यचे चित्र आहे.खरीप हंगामातील पिके सध्या जगली असली तरी खतांचे व कीटकनाशकांचे वाढलेले दर युरियाची अनुपलब्धता,लिंकिंग करून खते घेण्याची सक्ती अशा इतर प्रश्नांना शेतकऱ्यांना सध्याच्या घडीला तोंड द्यावे लागत आहे.जिल्ह्यात सर्वत्रच युरियाचा तुटवडा असल्याने शेतकरी बेजार झाला आहे.तसेच या वर्षी पासून सरकारने 1 रुपयात सुरू असलेली पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे.नव्याने सुरू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याचे चित्र आहे.31 जुलै ही या योजनेत सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत आहे.त्यामुळे अनेक सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी कमी दिसून येत आहे.

चौकट-
१) ‘ओस पडलेली कृषी केंद्र गजबजली…’
पाऊसच गायब झाल्याने तालुक्यातील कृषी केंद्र अगदी ओस पडली होती. खतांची खरेदी नाही की कीटकनाशकांना मागणी नाही,अशीच काहीशी अवस्था गेले काही दिवस दिसून येत होती.शेतकऱ्यांचा पीक व्यवस्थापनातला उत्साह हरपला होता.परंतु आता पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने आपसूकच शेतकरी पुन्हा कृषी केंद्रावर दिसू लागले आहेत.

२) ‘हवामानतज्ञांच्या नावानेही सुरू होता शिमगा’
20-25 दिवस मान्सूनच्या पावसात खंड पडला.त्यामुळे नेहमी नित्यनेमाने हवामानाचे अंदाज व्यक्त करणारेही अचानकपणे ‘गायब’ झाले. जून महिन्यात सर्वत्र धो-धो पाऊस पडणार म्हणणानाऱ्या अनेक हवामान तज्ञांच्या नावाने या काळात बोटे मोडली गेली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!