दत्तनगरच्या समस्यांचे तात्काळ निवारण करा;अन्यथा उग्र आंदोलन करू;भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष मगर यांचा इशारा

श्रीरामपूर–दत्तनगर भागातील लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करा अन्यथा आठ दिवसांमध्ये आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू या मागणीचे निवेदन ग्रामसेवक...

श्रीरामपूर
दत्तनगर भागातील लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करा अन्यथा आठ दिवसांमध्ये आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू या मागणीचे निवेदन ग्रामसेवक रुबाब पटेल यांना भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिले आहे.
यावेळी मगर म्हणाले की दत्तनगर गावातील प्रत्येक भागात रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये पडल्याने लोकांना खड्डे दिसत नाही आणि खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होत आहे. तसेच खड्ड्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यास सुद्धा खूप त्रास होत आहे. अनेक वेळा खड्डे बुजवण्याची मागणी केली असता ती मागणीकडे दुर्लक्ष केले आहे लाईटची खूप मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक भागात लाईट बंद आहे लोकांना अंधारातून जावा लागत आहे सगळीकडे कचरा साचल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे साफसफाई सुद्धा होत नाही अनेक भागात गटारी तुंबल्याने डास खूप वाढलेले आहेत. लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. स्मशानभूमीत शवदायिनी मागणी अनेक दिवसापासून केली असता ति पूर्ण न झाल्यामुळे  तिथे अक्षरशा अंत्यविधी खाली करावा लागत आहे. तसेच सध्या घरकुलाची यादी चालू आहे परंतु काही लाभार्थीकडे अपुरे कागदपत्र असल्यामुळे त्यांची आपण नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आपण सर्वांना लाभ कसा देता येईल यासाठी आपण पुन्हा लाभार्थ्याची नोंदणी करावी असे अनेक प्रकारच्या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. जर येत्या आठ दिवसांमध्ये लोकांच्या मागणीचा विचार न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर मागण्या पूर्ण करण्यासाठी तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू असा इशारा शेवटी देण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, सुरेश शिवलकर, विश्वास भोसले, संतोष केदारे, अश्रू बादमे,अनिल माघाडे ,तन्वीर शेख यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दत्तनगरच्या विविध समस्यांबाबत ग्रामसेवक यांना भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी निवेदन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!