खाजगी क्लासेसकडून विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट;कारवाईची रिपाईची मागणी

श्रीरामपूर:श्रीरामपूर शहरात ९ ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लासचालक शिक्षकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा रिपाई च्या वतीने...

श्रीरामपूर:
श्रीरामपूर शहरात ९ ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लासचालक शिक्षकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा रिपाई च्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसे निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार वनिता कल्हापुरे यांना रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड महिला आघाडीच्या रमादेवी धीवर शहराध्यक्ष विजय पवार राष्ट्रीय जनसेना पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड यांच्या हस्ते इतर देण्यात आले.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच श्रीरामपूर शहरात गेली अनेक वर्षापासून ९ ते १२ वी  पर्यंत विविध विषय तसेच सी ई टी, जी ई ई शिकवण्याचे खाजगी क्लास धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करून त्या नोंदणीच्या अधारे बऱ्याच शिक्षकांनी आपले क्लास श्रीरामपूर तालुका व शहरामध्ये थाटले आहेत. त्या आधारे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालू आहे. ९ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीन विषय इंग्लिश, मॅथ व सायन्स या विषयाचे 16 हजार रुपये घेतले जातात. तसेच दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीन विषयाचे ३० हजार रुपये घेतले जातात. अकरावी बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एका विषयाचे २० हजार रुपये तर  चार विषय शिकवले जातात.बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री सायन्स या चार विषयाचे ८० हजार रुपये घेतले जातात. एका तासाला २०० ते २५० विद्यार्थी एका क्लास मध्ये क्लासला येतात ६ ते ११ वाजेपर्यंत चार बॅच होतात. म्हणजे आठशे ते नऊशे विद्यार्थी क्लासमध्ये रोज शिकतात तसेच सी जी ई इ ची फी अडीच लाख रुपये आहे.श्रीरामपूर शहरांमध्ये क्लास ची संख्या जवळजवळ 25 ते 30  संख्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेणाऱ्या पैशाची उलाढाल ही करोडो रुपयांच्या घरात जाते. म्हणून अशा मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयेची आर्थिक लूट केली जाते. तसेच एवढी मोठी आर्थिक उलाढाल असताना सरकारला हे क्लासेसवाले जीएसटी भरतात का? याचा देखील सखोल तपास केला पाहिजे. तसे पाहायला गेले तर खाजगी क्लास चालवायला सरकारी मान्यता नसताना तरी देखील अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करून देखील शासन तसेच लोकप्रतिनिधी या खाजगी क्लास चालकांना चकार शब्द सुद्धा जाब विचारात नाही. म्हणून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लास चालकांचे दप्तर तपासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन विद्यार्थ्यांना परवडेल अशी वाजवी फी घेऊन त्याचा फलक क्लास बाहेर मोठ्या अक्षरात लावण्यात यावे. तसेच मुलांना शिकवणारे शिक्षक प्रशिक्षित आहेत का त्याची देखील चौकशी झाली पाहिजे.अन्यथा रिपाई च्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे.त्यावेळी मनोज काळे, कारभारी त्रिभुवन, संजय बोरगे, उज्वला येवलेकर, बाबासाहेब पवार, विलास जाधव, संघराज त्रिभुवन आदी उपस्थित होते.

क्लासचालक शिक्षकांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईच्या वतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!