नवीन मराठी शाळेत विठूनामाचा गजर; चिमुकल्यांच्या बालदिंडीने वेधले श्रीरामपूरकरांचे लक्ष

श्रीरामपूर-दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेने  आषाढी एकादशी निमित्त शनिवारी बालदिंडीचे आयोजन केले होते.या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी,पायजमा,बंडी,धोतर या पोशाखात मुले तर रंगीबेरंगी...

श्रीरामपूर-
दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेने  आषाढी एकादशी निमित्त शनिवारी बालदिंडीचे आयोजन केले होते.या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी,पायजमा,बंडी,धोतर या पोशाखात मुले तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या. हातात भगवे ध्वज,टाळ-मृदंगाचा निनाद त्याला वीणेची साथ,’ज्ञानोबा तुकोबांचा व विठोबा रुक्माई’चा जयघोष करीत गावातून निघालेल्या दिंडीने श्रीरामपूरकरांचे लक्ष वेधले होते.”दिंडीत शाळेतील  सुमारे 1500 हुन अधिक बाल वारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या दिंडी सोहळ्यासाठी तहान-भूक विसरून बाल वारकरी सकाळपासूनच शाळेत वारकरी वेशात मोठया उत्साहाने हजर झाले होते. शाळेतील बालवारकऱ्यांना पाहून ”विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली..” या ओळी ग्रामस्थ,पालकांच्या ओठी आपसूकच येत होत्या.शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी,तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांची आकर्षक व हुभेहुब वेशभूषा केली होती,टाळ मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखीसह हातात विविध समाज प्रबोधनपर संदेश देत गावातून मोठी फेरी काढत ग्रामस्थांना संदेश दिला.वारीत  बालवारकरी मोठे वारकरी प्रत्यक्ष वारीत जसे उंच पताका घेऊन नृत्य करतात तसे नृत्य करत होते,स्टील पाटीतील फुगडीचे फेर धरत पंढरपुरात,दिंडीत वारकरी जसे खेळ करतात तसे हुबेहूब खेळ खेळत होते.
बालवारकऱ्यांच्य  या भक्ती रसात अवघा गाव भक्तिमय झाला होता. शाळेतील विठ्ठल-रुक्मिणीची अगदी हुबेहूब वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत ग्रामस्थ,पालक व महिलावर्ग फोटो काढून घेण्यासाठी गर्दी करत होते.
दिंडी सोहळ्यासाठी हिंद सेवा मंडळाचे मानदसचिव  संजय जोशी, वैशाली जोशी,शाळेचे चेअरमन  ऋषिकेश जोशी, रेणुका जोशी,  संजय छल्लारे,  अशोक उपाध्ये बालवाडी विभागाचे चेअरमन सुशीलजी गांधी , स्कूल कमिटी सदस्य अमोल कोलते,  गोपाल उपाध्ये, सौ. रत्नमाला गाडेकर ,  अरुण धर्माधिकारी,  संजय कासलीवाल,चंद्रकांत सगम,विजय सेवक, तसेच श्रीमती रमाताई धीवर प्रशासकीय अधिकारी श्री बी एस कांबळे सर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पंढरपूर तीर्थक्षेत्राचे आणि वारीचे महत्व कळावे,त्यांना प्रत्यक्षात दिंडी सोहळा,रिंगण सोहळा कसा आयोजित करतात त्याची माहिती दिली असल्याचे  मुख्याध्यापक सचिन मुळे यांनी सांगितले.

दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेत आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!