नवीन मराठी शाळेत विठूनामाचा गजर; चिमुकल्यांच्या बालदिंडीने वेधले श्रीरामपूरकरांचे लक्ष

श्रीरामपूर-
दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेने  आषाढी एकादशी निमित्त शनिवारी बालदिंडीचे आयोजन केले होते.या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी,पायजमा,बंडी,धोतर या पोशाखात मुले तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या. हातात भगवे ध्वज,टाळ-मृदंगाचा निनाद त्याला वीणेची साथ,’ज्ञानोबा तुकोबांचा व विठोबा रुक्माई’चा जयघोष करीत गावातून निघालेल्या दिंडीने श्रीरामपूरकरांचे लक्ष वेधले होते.”दिंडीत शाळेतील  सुमारे 1500 हुन अधिक बाल वारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या दिंडी सोहळ्यासाठी तहान-भूक विसरून बाल वारकरी सकाळपासूनच शाळेत वारकरी वेशात मोठया उत्साहाने हजर झाले होते. शाळेतील बालवारकऱ्यांना पाहून ”विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली..” या ओळी ग्रामस्थ,पालकांच्या ओठी आपसूकच येत होत्या.शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी,तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांची आकर्षक व हुभेहुब वेशभूषा केली होती,टाळ मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखीसह हातात विविध समाज प्रबोधनपर संदेश देत गावातून मोठी फेरी काढत ग्रामस्थांना संदेश दिला.वारीत  बालवारकरी मोठे वारकरी प्रत्यक्ष वारीत जसे उंच पताका घेऊन नृत्य करतात तसे नृत्य करत होते,स्टील पाटीतील फुगडीचे फेर धरत पंढरपुरात,दिंडीत वारकरी जसे खेळ करतात तसे हुबेहूब खेळ खेळत होते.
बालवारकऱ्यांच्य  या भक्ती रसात अवघा गाव भक्तिमय झाला होता. शाळेतील विठ्ठल-रुक्मिणीची अगदी हुबेहूब वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत ग्रामस्थ,पालक व महिलावर्ग फोटो काढून घेण्यासाठी गर्दी करत होते.
दिंडी सोहळ्यासाठी हिंद सेवा मंडळाचे मानदसचिव  संजय जोशी, वैशाली जोशी,शाळेचे चेअरमन  ऋषिकेश जोशी, रेणुका जोशी,  संजय छल्लारे,  अशोक उपाध्ये बालवाडी विभागाचे चेअरमन सुशीलजी गांधी , स्कूल कमिटी सदस्य अमोल कोलते,  गोपाल उपाध्ये, सौ. रत्नमाला गाडेकर ,  अरुण धर्माधिकारी,  संजय कासलीवाल,चंद्रकांत सगम,विजय सेवक, तसेच श्रीमती रमाताई धीवर प्रशासकीय अधिकारी श्री बी एस कांबळे सर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पंढरपूर तीर्थक्षेत्राचे आणि वारीचे महत्व कळावे,त्यांना प्रत्यक्षात दिंडी सोहळा,रिंगण सोहळा कसा आयोजित करतात त्याची माहिती दिली असल्याचे  मुख्याध्यापक सचिन मुळे यांनी सांगितले.

दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेत आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News