नवीन मराठी शाळेत विठूनामाचा गजर; चिमुकल्यांच्या बालदिंडीने वेधले श्रीरामपूरकरांचे लक्ष

श्रीरामपूर-दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेने  आषाढी एकादशी निमित्त शनिवारी बालदिंडीचे आयोजन केले होते.या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी,पायजमा,बंडी,धोतर या पोशाखात मुले तर रंगीबेरंगी...

श्रीरामपूर-
दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेने  आषाढी एकादशी निमित्त शनिवारी बालदिंडीचे आयोजन केले होते.या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी,पायजमा,बंडी,धोतर या पोशाखात मुले तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या. हातात भगवे ध्वज,टाळ-मृदंगाचा निनाद त्याला वीणेची साथ,’ज्ञानोबा तुकोबांचा व विठोबा रुक्माई’चा जयघोष करीत गावातून निघालेल्या दिंडीने श्रीरामपूरकरांचे लक्ष वेधले होते.”दिंडीत शाळेतील  सुमारे 1500 हुन अधिक बाल वारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या दिंडी सोहळ्यासाठी तहान-भूक विसरून बाल वारकरी सकाळपासूनच शाळेत वारकरी वेशात मोठया उत्साहाने हजर झाले होते. शाळेतील बालवारकऱ्यांना पाहून ”विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली..” या ओळी ग्रामस्थ,पालकांच्या ओठी आपसूकच येत होत्या.शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी,तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांची आकर्षक व हुभेहुब वेशभूषा केली होती,टाळ मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखीसह हातात विविध समाज प्रबोधनपर संदेश देत गावातून मोठी फेरी काढत ग्रामस्थांना संदेश दिला.वारीत  बालवारकरी मोठे वारकरी प्रत्यक्ष वारीत जसे उंच पताका घेऊन नृत्य करतात तसे नृत्य करत होते,स्टील पाटीतील फुगडीचे फेर धरत पंढरपुरात,दिंडीत वारकरी जसे खेळ करतात तसे हुबेहूब खेळ खेळत होते.
बालवारकऱ्यांच्य  या भक्ती रसात अवघा गाव भक्तिमय झाला होता. शाळेतील विठ्ठल-रुक्मिणीची अगदी हुबेहूब वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत ग्रामस्थ,पालक व महिलावर्ग फोटो काढून घेण्यासाठी गर्दी करत होते.
दिंडी सोहळ्यासाठी हिंद सेवा मंडळाचे मानदसचिव  संजय जोशी, वैशाली जोशी,शाळेचे चेअरमन  ऋषिकेश जोशी, रेणुका जोशी,  संजय छल्लारे,  अशोक उपाध्ये बालवाडी विभागाचे चेअरमन सुशीलजी गांधी , स्कूल कमिटी सदस्य अमोल कोलते,  गोपाल उपाध्ये, सौ. रत्नमाला गाडेकर ,  अरुण धर्माधिकारी,  संजय कासलीवाल,चंद्रकांत सगम,विजय सेवक, तसेच श्रीमती रमाताई धीवर प्रशासकीय अधिकारी श्री बी एस कांबळे सर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पंढरपूर तीर्थक्षेत्राचे आणि वारीचे महत्व कळावे,त्यांना प्रत्यक्षात दिंडी सोहळा,रिंगण सोहळा कसा आयोजित करतात त्याची माहिती दिली असल्याचे  मुख्याध्यापक सचिन मुळे यांनी सांगितले.

दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेत आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!