आषाढी वारीत माजी आमदार कांबळे यांचा सहभाग;दिंड्यांना दिल्या भेटी; विठू रायाला घातले साकडे

श्रीरामपूर-
पंढरपूरची आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी श्रद्धेचा पर्वणीचा काळ मानला जातो. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे गेल्या १५ वर्षांपासून सलगपणे या वारीत सहभागी होत असून, यंदाही त्यांनी श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील विविध दिंड्यांना भेटी देत वारकऱ्यांशी संवाद साधला.
वारीदरम्यान कांबळे यांनी, “अहिल्यानगर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. विठ्ठल चरणी साकडे घालू की, संपूर्ण राज्यात चांगला पाऊस पडो, जमिनीवर हिरवळ फुलो आणि प्रत्येक शेतकरी सुखी होवो,” असे भावनिक आवाहन केले.
त्यांनी यावेळी सांगितले की, “मी स्वतः पूर्वी पायी वारी केली आहे. पायी चालताना शरीर थकतं, पण मनात फक्त विठ्ठल असतो. त्याच नावात शक्ती आहे. तीच ऊर्जा देणारी असते. म्हणूनच वारकरी विठ्ठलाच्या ओढीने वारी पूर्ण करतो आणि नतमस्तक होतो.”
यावेळी त्यांच्या सोबत ज्येष्ठ नेते राजेंद्र देवकर, तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, अ‍ॅड. सुभाष जंगले, मराठा संघाचे नेते सुरेश कांगुणे, पत्रकार बाळासाहेब भांड, सुनील नवले, अनिल पांडे, महेश माळवे व गौरव साळुंके आदी उपस्थित होते.कांबळे यांनी भेर्डापूर, निपाणी वडगाव, पाथरे खुर्द, वाकडी, टाकळीमिया, मांजरी, कारेगाव, देवळालीप्रवरा, लांडेवाडी, मुठेवाडगाव या गावांतील दिंड्यांना भेटी दिल्या. या ठिकाणी दिंडीचे चालक आणि वारकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
पंढरपूरात त्यांनी देवगड संस्थांचे महंत भास्करगिरी महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिंडीत येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. याशिवाय, सरला बेटावरील महंत रामगिरी महाराज यांच्या मठातही त्यांनी भेट देऊन चर्चा केली.विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सध्या व्हीआयपी दर्शन बंद असल्याने त्यांनी कोणतीही विशेष मागणी न करता मंदिराबाहेरून प्रदक्षिणा केली आणि नामदेव पायरीचे दर्शन घेऊन श्रीरामपूरकडे प्रयाण केले.

श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील विविध दिंड्यांना भेटी देत वारकऱ्यांशी संवाद साधला.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News