आषाढी वारीत माजी आमदार कांबळे यांचा सहभाग;दिंड्यांना दिल्या भेटी; विठू रायाला घातले साकडे

श्रीरामपूर-पंढरपूरची आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी श्रद्धेचा पर्वणीचा काळ मानला जातो. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे गेल्या १५ वर्षांपासून सलगपणे या वारीत...

श्रीरामपूर-
पंढरपूरची आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी श्रद्धेचा पर्वणीचा काळ मानला जातो. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे गेल्या १५ वर्षांपासून सलगपणे या वारीत सहभागी होत असून, यंदाही त्यांनी श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील विविध दिंड्यांना भेटी देत वारकऱ्यांशी संवाद साधला.
वारीदरम्यान कांबळे यांनी, “अहिल्यानगर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. विठ्ठल चरणी साकडे घालू की, संपूर्ण राज्यात चांगला पाऊस पडो, जमिनीवर हिरवळ फुलो आणि प्रत्येक शेतकरी सुखी होवो,” असे भावनिक आवाहन केले.
त्यांनी यावेळी सांगितले की, “मी स्वतः पूर्वी पायी वारी केली आहे. पायी चालताना शरीर थकतं, पण मनात फक्त विठ्ठल असतो. त्याच नावात शक्ती आहे. तीच ऊर्जा देणारी असते. म्हणूनच वारकरी विठ्ठलाच्या ओढीने वारी पूर्ण करतो आणि नतमस्तक होतो.”
यावेळी त्यांच्या सोबत ज्येष्ठ नेते राजेंद्र देवकर, तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, अ‍ॅड. सुभाष जंगले, मराठा संघाचे नेते सुरेश कांगुणे, पत्रकार बाळासाहेब भांड, सुनील नवले, अनिल पांडे, महेश माळवे व गौरव साळुंके आदी उपस्थित होते.कांबळे यांनी भेर्डापूर, निपाणी वडगाव, पाथरे खुर्द, वाकडी, टाकळीमिया, मांजरी, कारेगाव, देवळालीप्रवरा, लांडेवाडी, मुठेवाडगाव या गावांतील दिंड्यांना भेटी दिल्या. या ठिकाणी दिंडीचे चालक आणि वारकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
पंढरपूरात त्यांनी देवगड संस्थांचे महंत भास्करगिरी महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिंडीत येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. याशिवाय, सरला बेटावरील महंत रामगिरी महाराज यांच्या मठातही त्यांनी भेट देऊन चर्चा केली.विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सध्या व्हीआयपी दर्शन बंद असल्याने त्यांनी कोणतीही विशेष मागणी न करता मंदिराबाहेरून प्रदक्षिणा केली आणि नामदेव पायरीचे दर्शन घेऊन श्रीरामपूरकडे प्रयाण केले.

श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील विविध दिंड्यांना भेटी देत वारकऱ्यांशी संवाद साधला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!