आषाढी वारीत माजी आमदार कांबळे यांचा सहभाग;दिंड्यांना दिल्या भेटी; विठू रायाला घातले साकडे

श्रीरामपूर-पंढरपूरची आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी श्रद्धेचा पर्वणीचा काळ मानला जातो. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे गेल्या १५ वर्षांपासून सलगपणे या वारीत...

श्रीरामपूर-
पंढरपूरची आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी श्रद्धेचा पर्वणीचा काळ मानला जातो. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे गेल्या १५ वर्षांपासून सलगपणे या वारीत सहभागी होत असून, यंदाही त्यांनी श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील विविध दिंड्यांना भेटी देत वारकऱ्यांशी संवाद साधला.
वारीदरम्यान कांबळे यांनी, “अहिल्यानगर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. विठ्ठल चरणी साकडे घालू की, संपूर्ण राज्यात चांगला पाऊस पडो, जमिनीवर हिरवळ फुलो आणि प्रत्येक शेतकरी सुखी होवो,” असे भावनिक आवाहन केले.
त्यांनी यावेळी सांगितले की, “मी स्वतः पूर्वी पायी वारी केली आहे. पायी चालताना शरीर थकतं, पण मनात फक्त विठ्ठल असतो. त्याच नावात शक्ती आहे. तीच ऊर्जा देणारी असते. म्हणूनच वारकरी विठ्ठलाच्या ओढीने वारी पूर्ण करतो आणि नतमस्तक होतो.”
यावेळी त्यांच्या सोबत ज्येष्ठ नेते राजेंद्र देवकर, तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, अ‍ॅड. सुभाष जंगले, मराठा संघाचे नेते सुरेश कांगुणे, पत्रकार बाळासाहेब भांड, सुनील नवले, अनिल पांडे, महेश माळवे व गौरव साळुंके आदी उपस्थित होते.कांबळे यांनी भेर्डापूर, निपाणी वडगाव, पाथरे खुर्द, वाकडी, टाकळीमिया, मांजरी, कारेगाव, देवळालीप्रवरा, लांडेवाडी, मुठेवाडगाव या गावांतील दिंड्यांना भेटी दिल्या. या ठिकाणी दिंडीचे चालक आणि वारकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
पंढरपूरात त्यांनी देवगड संस्थांचे महंत भास्करगिरी महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिंडीत येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. याशिवाय, सरला बेटावरील महंत रामगिरी महाराज यांच्या मठातही त्यांनी भेट देऊन चर्चा केली.विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सध्या व्हीआयपी दर्शन बंद असल्याने त्यांनी कोणतीही विशेष मागणी न करता मंदिराबाहेरून प्रदक्षिणा केली आणि नामदेव पायरीचे दर्शन घेऊन श्रीरामपूरकडे प्रयाण केले.

श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील विविध दिंड्यांना भेटी देत वारकऱ्यांशी संवाद साधला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!