‘अशोक’च्या कामगारांच्या वेतन कपातीला विरोध-भोसले; कारखान्याच्या सद्यस्थितीवर चर्चेसाठी बैठकीचे आयोजन

श्रीरामपूर-अशोक कारखान्याचे व्यवस्थापन कामगारांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून कामगार संघटना व कारखाना व्यवस्थानात यासंदर्भात वाटाघाटी चालू...

श्रीरामपूर-
अशोक कारखान्याचे व्यवस्थापन कामगारांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून कामगार संघटना व कारखाना व्यवस्थानात यासंदर्भात वाटाघाटी चालू असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.त्यात पुढे म्हटले की,अतिशय काटकसर व पारदर्शक व्यवहाराचा डांगोरा पिटणाऱ्या कारखाना व्यवस्थापनाने नको ते उद्योग करून कारखाना आर्थिक अडचणीत आणला आहे. सुमारे साडेसहा लाख टन गाळप करणाऱ्या ‘अशोक’ ला २०२५-२६ च्या हंगामात केवळ तीन लाख नव्वद हजार टन गाळप करून हंगाम आटोपता घ्यावा लागला. सातत्याने इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी मिळत असलेल्या दरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अशोक कडे पाठ फिरवल्याने गाळप हंगाम अडचणीत येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानाना व्यवस्थापनाला सूचित केले होते. परंतु नेतृत्वाने सभासदांच्या मागणीकडे डोळेझाक केल्याने तसेच  डिस्टिलरी व इथेनाॕल प्रकल्पांची क्षमता वाढ व इन्सनीरेशन बॉयलर या सारख्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या प्रकल्पामुळे दरवर्षी कारखान्याला सुमारे ५० कोटी रुपये व्याजाचे भुर्दंड बसत आहे.ज्या कामगारांना कार्यकर्ता म्हणून कार्यक्षेत्राच्या चाळीस गावात मिरविले,आज त्याच कामगारांवर  वेतन कपातीच्या निर्णयास सामोरे जाण्याची वेळ यावी या सारखे दुर्भाग्य नाही. अशोक कारखान्याच्या व्यवस्थापनापुळे कारखाना आर्थिक दिवाळखोरीत आला आहे.आज जे आर्थिक  संकट उभे राहिले ते नको ते उद्योग आणि गैरव्यवहार यामुळे आहे,यात कामगारांचा काय दोष?असा सवाल करत कामगारांच्या पगार कपातीच्या निर्णयास सभासदांचा विरोध असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.अशोक कारखान्याचे बहुतांश कामगार हे सभासद किंवा सभासदांची मुले आहेत.त्यामुळे त्यांना कुणीही वेठबिगार समजू नये.कारखान्याच्या पैशातून शिक्षण संस्थांना आर्थिक रसद पुरवली जाते.कारखाना अडचणीत आहे तरी गाड्याघोड्या उडविल्या जातात,अशी वस्तुस्थिती असल्याने चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालकांनी कारखाना वाहने वापरु नयेत,भत्ते घेवू नये, गेस्ट हाऊस बंद करुन काटकसर करावी परंतु विनाकारण कामगारांवर अन्याय करु नये.वेतन कपातीचा निर्णय घेतल्यास व्यवस्थापनाला सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही भोसले यांनी दिला आहे.

गेल्या ५-६ वर्षांतील गाळप हंगामामध्ये साधारण ३५-३७ लाख टन ऊसाचे गाळप होऊनही अशोक सहकारी कारखान्याचा संचित तोट्यात वाढ होऊन तोटा मागील अहवालानुसार साधारण ५० कोटी पर्यंत वाढलेला आहे.तो या वर्षीच्या अहवालात आणखी वाढण्याची शक्यता आहे.कामगारांचे गेला ८-९ महिन्यांपासून पगार नाहीत,ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट थकलेले आहे या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकरी व सभासद तसेच आजी माजी कामगार व अशोक सहकारी साखर कारखान्यावर प्रेम करणार्‍या नागरीकांनी शहरातील विश्रामगृहावर २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली असून त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश ताके यांनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

श्रीरामपूर पोलीसांकडून 27 मोबाईल मूळ मालकांना परत

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून गहाळ झालेले किंवा चोरी झालेले २७ मोबाईल शहर पोलीस ठाण्याकडून त्यांच्या मूळ मालकांना डीवायएसपी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हस्ते

Latest News

Trending News

error: Content is protected !!