तक्रारदार महिलांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार; तृप्ती देसाई यांची दिनकर यांच्या खुलशावर प्रतिक्रिया

desai trupti shrirampur

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आमच्याकडे ज्या महिला पदाधिकाऱ्यांची तक्रार आली, त्यानुसार आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे रीतसर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची तक्रार केली आहे. त्यामुळे यात कुणाची बदनामी करण्याचा प्रश्नच येत नाही.यासंदर्भात लवकरच ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली, त्या सर्व महिलांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी काल केलेल्या खुलशावर तृप्ती देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, नितीन दिनकर यांच्या विरोधात जी लेखी तक्रार महिलांनी आम्हाला दिली त्यानुसार रीतसर मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रार केलेली आहे, जो त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला कधीही अपलोड झालेला नाही.


काही महिन्यांपूर्वी हा व्हिडिओ दिनकर यांनी अपलोड केला असे त्यांचे म्हणणे आहे परंतु महिलांबरोबर नाचताना व दारू पितानाचा हा व्हिडिओ त्यांनी कधीच अपलोड केलेला नाही. नितीन दिनकर हे स्वतःच्या बचावासाठी साफ खोटं बोलत आहेत.


आमच्याकडे जी तक्रार आली त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे त्यामुळे कुणाची बदनामी करण्याचा प्रश्नच येत नाही.यासंदर्भात लवकरच ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली आहे त्या सर्व महिलांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

 

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News