श्रीरामपूर नगरपालिकेत अभियंत्याची कर्मचाऱ्यास धक्काबुक्की शहर पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद

A_tense_office_confrontation_between_a_municipal_engi_2

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

श्रीरामपूर नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचऱ्यांमधील वादाच्या घटना कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. आता तर वीज विभागातील अभियंत्याने थेट कंत्राटी कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. संदिप वायकर या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी मनोज मोरे या अभियंत्याविरूद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच सर्व विभागात लेखी तक्रारही पाठविण्यात आली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, संदिप हौशीराम वायकर हे गेल्या पाच वर्षांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने डाटा ऑपरेटर म्हणून पालिकेत कार्यरत आहे. त्यांची नियुक्ती वीज विभागात करण्यात आली होती. दरम्यान गेल्या पाच महिन्यापूर्वी मनोज संजय मोरे हे वीज विभागात अभियंता म्हूणन बदलून आले. त्यांनंतर वायकर व मोरे यांच्यात अनेकदा कामावरून व इतर कारणावरून खटके उडत होते. मोरे हे मद्यपान करून कामावर येत असल्याचा आरोपही तक्रारीमध्ये केला आहे. मद्यधुंद अवस्थेत मोरे कार्यालयात वायकर यांच्यावर चिडचीड करणे, शविगाळ करणे, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे वाजवणे तसेच गुलामासारखी वागणूक देत होते. शिवाय कुठलेही कारण नसताना १८ जून रोजी वायकर यांना कामावरून काढून टाकत आपल्या पत्नीला ठेकेदाराकरवी कंत्राटी पदावर नियुक्त करून घेतले.

वायकर यांनी याबाबत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी मोरे यांना समज दिली. मात्र त्यांच्या वगणुकीत कुठलाही बदल झाला नाही. उलट १९ जून रोजी वायकर कामावर आले असता. मोरे यांनी त्यांना खुर्चीतून उठण्यास व बाहेर जाण्यास सांगितले. वायकर यांनी नकार दिल्यानंतर मोरे यांनी वायकर यांना गचांडीस धरून बाहेर ढकलले. त्यांना धक्काबुककी व शिवीगाळ केली. घडला प्रकार प्रारंभी उपमुख्याधिकारी यांच्याकडे व नंतर मुख्याधिकारी यांना सांगण्यात आला. आता वाकयर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी मोरे यांच्या विरूद्ध अदलख पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

पाच महिन्यांपासून वाद…

गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. वायकर यांनी याबाबत माझ्याकडे तक्रारही केली होती. काल त्यांच्यात भांडणे झाल्याची माहिती आहे. दोघांची बाजू समजावून घ्यावी लागेल.

  • मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी, नगर परिषद श्रीरामपूर

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News