आपला कारखाना तो आपलाच कारखाना-महंत रामगिरी महाराज;’अशोक’च्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ

श्रीरामपूर-आपला कारखाना तो आपलाच असतो. त्याच्या प्रगतीसाठी, तो टिकवण्यासाठी संचालक मंडळ, कामगार व सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे.शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार टिकवणे...

श्रीरामपूर-
आपला कारखाना तो आपलाच असतो. त्याच्या प्रगतीसाठी, तो टिकवण्यासाठी संचालक मंडळ, कामगार व सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे.शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार टिकवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे, व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, सुरेश गलांडे, ज्ञानदेव साळुंके, सोपानराव राऊत, भाऊसाहेब कहांडळ, दिगंबर शिंदे, बाबासाहेब काळे, अशोक बँकेचे चेअरमन अॅड. सुभाष चौधरी, व्हा. चेअरमन भाऊसाहेब हळनोर, संजय छल्लारे, सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, डॉ. वंदना मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, आपली आई ती आपलीच असते; दुसऱ्याची आई कितीही चांगली वाटत असली तरी ती आपली होऊ शकत नाही. आपली झोपडी आपली असते; दुसऱ्याचा बंगला आपल्या काय कामाचा? कोणत्याही कारखान्याचा विकास होण्यासाठी कामगार, संचालक, शेतकरी यांचे योगदान महत्वाचे असते. सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जो दुसऱ्यांच्या मुखात घास घालतो त्याला देव म्हणतात आणि जो दुसऱ्यांच्या तोंडातील घास काढतो त्याला दानव म्हणतात. आपण देव राहिले पाहिजे. मराठवाड्यातील अनेक कारखाने बंद पडली आहेत, अशी परिस्थिती आपली होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मुरकुटे म्हणाले, कारखान्याची सत्ता आपल्या ताब्यात आली तेव्हा कारखान्याची गाळप क्षमता १५०० मेट्रिक टन होती. ती २७०० पर्यंत नेली आणि आज कारखान्याची गाळप क्षमता ४२०० टनापर्यंत आहे. आज ऊस भावाचे कारण पुढे करत बाहेरील कारखान्यांना व खासगी कारखान्यांना येथे काही मंडळी ऊस पुरवठा करत आहेत. राहुरीत जाऊन तुम्ही काय परिस्थिती आहे ते पाहून यावे. यावेळी आपल्याकडून ऊस नेऊन गाळप केले. बाहेरील लोकांना तुम्ही ऊस देता, त्यांनी येथील बंधाऱ्यासाठी चिमूटभर सिमेंट तरी दिले का याचा विचार करायला पाहिजे. त्यांनी तुमच्या भागात पाणी वाढविले का, उलट लिफ्टद्वारे पाणी उचलले आहे. त्यामुळे अशोक कारखाना जिवंत ठेवण्यासाठी आपल्या कारखान्याला ऊस दिला पाहिजे असे माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरज मुरकुटे यांनी आभार मानले

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!