आपला कारखाना तो आपलाच कारखाना-महंत रामगिरी महाराज;’अशोक’च्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ

श्रीरामपूर-आपला कारखाना तो आपलाच असतो. त्याच्या प्रगतीसाठी, तो टिकवण्यासाठी संचालक मंडळ, कामगार व सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे.शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार टिकवणे...

श्रीरामपूर-
आपला कारखाना तो आपलाच असतो. त्याच्या प्रगतीसाठी, तो टिकवण्यासाठी संचालक मंडळ, कामगार व सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे.शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार टिकवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे, व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, सुरेश गलांडे, ज्ञानदेव साळुंके, सोपानराव राऊत, भाऊसाहेब कहांडळ, दिगंबर शिंदे, बाबासाहेब काळे, अशोक बँकेचे चेअरमन अॅड. सुभाष चौधरी, व्हा. चेअरमन भाऊसाहेब हळनोर, संजय छल्लारे, सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, डॉ. वंदना मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, आपली आई ती आपलीच असते; दुसऱ्याची आई कितीही चांगली वाटत असली तरी ती आपली होऊ शकत नाही. आपली झोपडी आपली असते; दुसऱ्याचा बंगला आपल्या काय कामाचा? कोणत्याही कारखान्याचा विकास होण्यासाठी कामगार, संचालक, शेतकरी यांचे योगदान महत्वाचे असते. सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जो दुसऱ्यांच्या मुखात घास घालतो त्याला देव म्हणतात आणि जो दुसऱ्यांच्या तोंडातील घास काढतो त्याला दानव म्हणतात. आपण देव राहिले पाहिजे. मराठवाड्यातील अनेक कारखाने बंद पडली आहेत, अशी परिस्थिती आपली होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मुरकुटे म्हणाले, कारखान्याची सत्ता आपल्या ताब्यात आली तेव्हा कारखान्याची गाळप क्षमता १५०० मेट्रिक टन होती. ती २७०० पर्यंत नेली आणि आज कारखान्याची गाळप क्षमता ४२०० टनापर्यंत आहे. आज ऊस भावाचे कारण पुढे करत बाहेरील कारखान्यांना व खासगी कारखान्यांना येथे काही मंडळी ऊस पुरवठा करत आहेत. राहुरीत जाऊन तुम्ही काय परिस्थिती आहे ते पाहून यावे. यावेळी आपल्याकडून ऊस नेऊन गाळप केले. बाहेरील लोकांना तुम्ही ऊस देता, त्यांनी येथील बंधाऱ्यासाठी चिमूटभर सिमेंट तरी दिले का याचा विचार करायला पाहिजे. त्यांनी तुमच्या भागात पाणी वाढविले का, उलट लिफ्टद्वारे पाणी उचलले आहे. त्यामुळे अशोक कारखाना जिवंत ठेवण्यासाठी आपल्या कारखान्याला ऊस दिला पाहिजे असे माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरज मुरकुटे यांनी आभार मानले

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!