श्रीरामपुर-
जिल्हाधिकारी पंकज अशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.यामध्ये जेष्ठ नागरिकांच्या समस्या जिल्हाधिकारी यांनी आत्मीयतेने ऐकून घेतल्या. तसेच यावेळी काही मागण्याही करण्यात आल्या.महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक संघटना अहिल्यानगर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व समाजकल्याण कार्यालय यांची दि. ९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली.यात जेष्ठ नागरिक संघटनेसाठी अहिल्यानगर व शिर्डी येथे विरंगुळा केंद्र जागेसह इमारत बांधून द्यावी. जेष्ठासाठी ५००० हजार रुपये मानधन सरसकट द्यावे. मुख्यमत्री तिर्थदर्शन योजना पुन्हा चालु करावी. पंतप्रधान वयोवंदना ५ लाखापर्यतचे वैद्यकीय उपचार मोफत कार्ड, शासनामार्फत काढून मिळावे.जेष्ठ नागरिकाचे डोल व इतर योजनेचे थकित पैसे देणी दिपावलीपूर्वी खात्यात रक्कम जमा करावी,जेष्ठाना ग्रामपंचायतपासुन ते मंत्रालयापर्यंत,शासकीय कार्यालय, धार्मिक ठिकाणी,मंत्रीभेटी अदि ठिकाणी अग्रक्रमाने प्राध्यान्य मिळावे अशा मागण्या करण्यात आल्या.अनेक सरकारी योजनाबद्दल जिल्हाधिकारी अशीया व समाज कल्याणचे कोरनटीवार यांच्याबरोबर सकारत्मक चर्चा झाली.यावेळी सर्व जेष्ठ नागरिकांच्या वतीने संघटनेचे उपाध्यक्ष वसंतराव मुठे यांनी जिल्हाधिकारी अशीया व इतर अधिकरी यांचा सत्कार केला.यावेळी शब्बीरभाई पठाण, नुर शेख,दरेकर,ज्ञानेश्वर चौधरी,आगरकर,युनुस पठाण, काझीभाई, हीराबाई गोरखे यासह मोठ्या संख्येने जेष्ठ नागरीक उपस्थित होते.
