श्रीरामपूर-
मुठेवाडगाव,माळवाडगाव व खानापुर येथील शेती व घरघुती ग्राहकांना भोकर सबस्टेशन येथून कायम कमी दाबाने वीज पुरवठा होत होता.त्यामुळे सदर प्रश्न भाजपाचे जेष्ठ नेते गिरिधर आसने व सरचिटणीस डॉ.शंकरराव मुठे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मांडला. त्याचा सातत्याने पाठपुरवठा केल्याने आता पुढील दोन महिन्यात मुठेवाडगाव माळवाडगावला पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार आहे. भोकर ते खानापुर तसेच हरेगाव ते माळवाडगाव येथे नविन पोल उभे करण्याचे काम चालू होते परंतु सदर कामाला विलम्ब होत होता.त्यामुळे श्रीरामपुर येथे झालेल्या आढावा बैठकी मध्ये डॉ. मुठे यांनी नामदार विखे पाटील यांच्याकडे याबाबद काही प्रश्न उपस्थित केले. यात सकाळी पाहटे ५ वाजता लाईट बंद करने, नविन लाईनचे पोल टाकणे बाबद ठेकेदारचा मनमानी कारभार यांचा समावेश होता. त्याबद्द्ल विखे पाटील यांनी महवितरणचे भांगाळे यांना सूचना केल्या.प्रत्यक्ष गावात पाहणी करुन ज्या काही समस्या आहे त्याची तातडीने सोडवणुक करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे इंजिनियर केदारी,भोकर सबस्टेशन अधिकारी मुळे,हरेगाव सबस्टेशनचे गोसावी व वायरमन यांनी पाहणी केली.मुठेवाडगाव येथील मावलयाचा मळा पर्यन्त ८ते ९ डीपी (ट्रान्सफार्मर) यांचा वीज पुरवठा तात्काळ हरेगाववरून जोडून दयावा व लाईनचे काम लगेच चालू करुन काही प्रमाणात भोकर सबस्टेशनचा लोड कमी करावा. तसेच सकाळचे लोडसिडिंग बंद करण्याच्या सुचना दिल्या. तसेच बीसीनाला येथील मुठेवाडगाव व माळवाडगाव पाणी पुरवठा योजना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही सूचना केल्या. यावेळी गिरधर आसने, डॉ.शंकर मुठे, शिवाजी मुठे,तात्यासाहेब चौधरी, गोकुळ मुठे, साईनाथ मुठे,सोपान द्वारकानाथ मुठे,जय मुठे, वेताळ आदी उपस्थित होते.
