शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार भरपाई द्या;आ.ओगले यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

श्रीरामपुर-बळीराजा कधी नव्हे एवढा अडचणीत सापडला असून सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक नजरेसमोर पाण्यात सडत आहे. तरी सरकारने तातडीने ओला दुष्काळ...

श्रीरामपुर-
बळीराजा कधी नव्हे एवढा अडचणीत सापडला असून सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक नजरेसमोर पाण्यात सडत आहे. तरी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५०हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती आ. ओगले यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पंधरा दिवसांपासून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून त्यामुळे शेती व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे अतिवृष्टी मध्ये कपाशी सोयाबीन,मका,कांदा,भाजीपाला, फळबागा व जनावरांच्या घास पिकाचे देखील नुकसान झाले आहे. तसेच नदी व ओढ्याच्या लगतची शेती खरडून गेली असून सौर कृषी पंप देखील वाहून गेले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील प्रकाश खपके या तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे व आधी घेतलेल्या पीक कर्जाचा धसका घेऊन आत्महत्या केली आहे. अशी भयावह परिस्थिती सध्या संपूर्ण मतदारसंघात आहे.सदर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून सरसकट पंचनामे करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी जेणेकरून अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला हातभार लागेल. शेती व पीक मालाची हानी मोठी आहे तरी आपण तातडीने याबाबत प्रशासनाला सूचना द्याव्यात आणि लवकरात लवकर संपुर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.

सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५०हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!