श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;खासदारकी पणाला लावू-खा.वाकचौरे
श्रीरामपूर-श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गापेक्षा दुप्पट तोट्यात असलेल्या रेल्वे मार्गाला सरकारने मंजुरी दिली. त्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. मात्र गेल्या तीन वर्षापासून...
श्रीरामपूर- श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गापेक्षा दुप्पट तोट्यात असलेल्या रेल्वे मार्गाला सरकारने मंजुरी दिली. त्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. मात्र गेल्या तीन वर्षापासून या रेल्वे मार्गाला मंजुरीपासून वंचित ठेवून या भागावर अन्यायचं केला आहे. 104 वर्षापासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची आग्रही मागणी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संसदेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली. खा. वाकचौरे यांनी संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, 104 वर्षापासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाला ब्रिटिशांनी मंजुरी देऊन भूमी अधिग्रहण करत माती भरावाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सर्वेक्षण पूर्ण होऊन सर्वेक्षण अहवाल जून 2022 मध्ये मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. हे सर्व असूनही केवळ आरओआर चे कारण देत गेल्या तीन वर्षापासून या रेल्वे मार्गाला मंजुरी पासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले तसेच या रेल्वे मार्गापेक्षा दुप्पट तोट्यात असलेल्या रेल्वे मार्गाला सरकारने मंजुरी देत अशा रेल्वे मार्गाचे काम सुरू आहेत याकडे खासदार वाकचौरे यांनी लक्ष वेधले श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासन हे 50 टक्के खर्च करण्यास तयार असल्याचेही केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात आणून दिले आहे या सर्व गोष्टी पूरक असूनही केवळ केंद्राच्या मंजुरीमुळे हा रेल्वे मार्ग प्रलंबित असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले तसेच या रेल्वे मार्गामुळे जागतिक तीर्थक्षेत्र असलेले शिर्डी व तिरुपती बालाजी या तीर्थक्षेत्रातील अंतर 550 किलोमीटरने कमी होणार आहे तसेच या रेल्वे मार्गावर दहा ते पंधरा साखर कारखाने असल्याने रेल्वेला मालवाहतुकीतून जास्तीचे उत्पन्न मिळणार आहे या रेल्वे मार्गाला प्रलंबित ठेवल्यामुळे या मार्गावरील तालुके दोन जिल्हे यांचा विकास खुंटलेला असल्याचेही त्यांनी रेल्वे मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे या सर्व बाबींचा विचार करता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाबाबत सकारात्मकता दाखवली आहे या मार्गाच्या निवेदनाच्या प्रती रेल्वे राज्यमंत्री वी सोमन्ना व रवणीत सिंह यांना देण्यात आले आहे
माझी खासदारकी पणाला लावील श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गावर कशाप्रकारे अन्याय केला जात आहे हे रेल्वेमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे. या रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी आणि हा रेल्वे मार्ग पूर्णतःवास लावण्यासाठी मी माझी खासदारकी पणाला लावील-खासदार भाऊसाहेब वाकचौरे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली
श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी
श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा
श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा
श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु