मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये-महंत रामगिरी महाराज;सरला बेटाच्या १०९ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता देऊ-मुख्यमंत्री फडणवीस;श्री क्षेत्र शनिदेव १७८ व्या अखंड  हारिनाम सप्ताहाची सांगता

श्रीरामपूर-
मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे.मनोवृत्ती बदल झाला  तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात आहे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटाचा योगीराज गंगागिरी महाराज१७८ वा अखंड हरिनाम सप्ताहातील सांगतेच्या काला किर्तनातून “कृष्णा वेध येली विरहिणी बोले” ह्या  संत ज्ञानेश्वरांच्या एका अभंगातील  कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी स्त्री, गोपी चंद्राला पाहून म्हणते की, “हे चंद्रा, तू माझ्या अंगाला उबारा देत आहेस, पण मला चंदन लावू नकोस, वाराही घालू नकोस. कारण कृष्णाशिवाय मला काहीही चांगले वाटत नाही.”
या अभंगात, विरहिणी स्त्री कृष्णाच्या विरहाने किती दुःखी आहे, तिची व्याकुळता, आणि कृष्णाशिवाय तिला कशातच आनंद मिळत नाही हे विरहान रचनेतून महाराजांनी स्पष्ट  केले आहे. रचनेचे विवेचन करताना महाराज पुढे म्हणाले की, आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे.गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातुन अनेकांचे व्यसन नष्ट झाले स्वातंत्र्यपूर्व  काळातही महाराजांनी सप्ताह अनेक अडचणी ला सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवले.  अध्यात्मात आल्यास भजन – किर्तन नाही आले तरी चालेल परंतु वाईट मार्गाने तरी तरुण जाणार नाही. अध्यात्मिक मार्गावर चालल्यास तरुणाना चांगली दिशा मिळेल अशा दिशाहिन समाजाला योग्य दिशा देऊ कोण देत असेल तर ते फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच देऊ शकत असल्याचे महाराज म्हणाले.

श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटाचा योगीराज गंगागिरी महाराज १७८ वा अखंड हरिनाम सप्ताहातील सांगतेच्या काला किर्तनात उपदेश करताना महंत रामगिरी महाराज.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,या भागातील सरला बेटाचा विकास करण्यासाठी १०९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी मान्यता देण्यात येईल. तसेच देवगाव शनि येथील उच्च पातळी बंधाऱ्याची मागणीही  पूर्ण करु, तसेच या सोहळ्याला दरवर्षी येईन असेही आश्वासन त्यांनी दिले.यावेळी जलसंधारण मंत्री गिरीश महाजन,नामदार राधाकृष्ण विखे पाटील,सुदशन चनलचे सुरेश चव्हाणके आमदार रमेश पा बोरणारे,आमदार विठ्ठलराव लंघे,आमदार अमोल खताळ, माजी आमदार भानुदास मुरकुटे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,दिनेशभाऊ परदेशी,आविनाश पा गंलाडे डॉ प्रकाश शेळके सावदा आश्रमाचे मंहत कृष्णगिरी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योंगानंद महाराज विक्रम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्या सह  लाखो भाविकांनी बुंदी व चिवडाचा महाप्रसाद
घेतला.

अखंड हरिनाम सप्ताहात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ परत;नेवासा पोलीसांनी विधिवत केले परत

श्रीरामपूर-नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ संबंधितांना नेवासा पोलीसांनी मंगळवारी परत केले.रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे २२ हजार ४०० रुपये किमतीचे पितळी

टाकळीभान टेलटॅंकच्या पाण्याचे आ.ओगले यांच्या हस्ते जलपूजन;टेलटॅंक परिसरात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार-आ.ओगले

श्रीरामपुर-टाकळीभान टेलटॅंक परिसरात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार असून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे  प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे . श्रीरामपूर तालुक्याच्या टाकळीभान व परिसरातील गावांना वरदान ठरलेल्या

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणात झळकले ‘शेतकरी कर्जमुक्ती’चे पोष्टर;सुरक्षा यंत्रणांची काही काळ उडाली भंबेरी;शनी देवगाव सप्ताहस्थळी घडला प्रकार

श्रीरामपूर-नितीन शेळके'माय बाप सरकार गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या'अशा आशयाच्या मागणीचे पोष्टर एका तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झळकावल्याने काही काळ सुरक्षा यंत्रणा व पोलीस प्रशासन यांची धावपळ उडाली

मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये-महंत रामगिरी महाराज;सरला बेटाच्या १०९ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता देऊ-मुख्यमंत्री फडणवीस;श्री क्षेत्र शनिदेव १७८ व्या अखंड  हारिनाम सप्ताहाची सांगता

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे.मनोवृत्ती बदल झाला  तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात

आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;संतशक्ती पाठीशी उभी राहिल्याने विजय सुकर;श्री क्षेत्र देवगाव शनी  येथील १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

श्रीरामपूर-नितीन शेळकेलोकसभा निवडणूकित आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग झाला.काही मूठभर लोकांनी राष्ट्रीय व अध्यात्मिक विचार संपवण्याचा विडाच उचलला होता. ही मंडळी संतांच्या विचारांनाही नष्ट करू पाहत होती. मात्र आमच्यासाठी संतशक्ती

खालच्या पातळीची टीका करणाऱ्यांना त्यांचे अनुभव विचारा-मा.खा.डॉ. विखे यांचा खोचक टोला;अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन

श्रीरामपूर-माझी विरोधकांना विनंती आहे की खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका. ज्यांनी ती केली त्यांना ती अजिबात परवडली नाही.हवं तर वेळ काढून त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांचा अनुभव व त्यांचे

Latest News

Trending News