मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणात झळकले ‘शेतकरी कर्जमुक्ती’चे पोष्टर;सुरक्षा यंत्रणांची काही काळ उडाली भंबेरी;शनी देवगाव सप्ताहस्थळी घडला प्रकार
श्रीरामपूर-नितीन शेळके‘माय बाप सरकार गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या’अशा आशयाच्या मागणीचे पोष्टर एका तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झळकावल्याने काही...
श्रीरामपूर-नितीन शेळके ‘माय बाप सरकार गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या’ अशा आशयाच्या मागणीचे पोष्टर एका तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झळकावल्याने काही काळ सुरक्षा यंत्रणा व पोलीस प्रशासन यांची धावपळ उडाली होती.लागलीच पोलीस प्रशासनाने ते पोस्टर त्या शेतकऱ्याच्या ताब्यातून काढून घेत व्यासपीठाकडे नेले. अगदी अचानक घडलेल्या मिनिटभराच्या या प्रसंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा यंत्रणांची मात्र भंबेरी उडाली होती.श्री क्षेत्र देवगाव शनी येथील १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित होते.यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आमदार रमेश बोरणारे, विठ्ठलराव लंघे, अमोल खाताळ, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदींसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मुख्यमंत्री यांचा दौरा आणि सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मागणी संबंधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अगदी ‘अलर्ट मोड’वर होत्या.
शनी देवगाव सप्ताहात ‘माय बाप सरकार गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या’ अशा आशयाच्या मागणीचे पोष्टर एका तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झळकावले.
मुख्यमंत्री यांच्या वाहनांच्या ताफ्याच्या मार्गापासून व्यासपीठाची तसेच आजूबाजूच्या सर्व ठिकाणांची कसून तपासणी सुरक्षा यंत्रणाकडून सकाळपासूनच सुरू होती. असे असतानाही काल्याच्या किर्तनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरू असताना ‘माय बाप सरकार गोर गरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या’या आशयाच्या मागणीचे पोष्टर घेऊन एक तरुण शेतकरी उभा राहिला.त्याने कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी केली नाही.मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी त्याने आपल्या त्या कृतीतून व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष आपल्या मागणीकडे वेधण्याचा प्रयत्न केला.अगदी मिनीटभराच्या आत हा सर्व प्रकार घडला.सुरक्षा यंत्रणानी तात्काळ शेतकऱ्याकडे धाव घेत त्याच्या हातून ते पोष्टर ताब्यात घेतले.दरम्यान सदर घटना घडत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीच्या घटक पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे.भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार या तीनही नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू,असेही त्यांनी आश्वासित केले होते.परंतु याबाबतचे आश्वासन सरकारकडून पाळले जात नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेसह राज्यातील शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या राज्यातल्या लाडक्या बहिणी व शेतकरी यांनी आम्हाला निवडून दिले असून त्यांना येणाऱ्या 5 वर्षांच्या काळात आम्हाला निवडून दिल्याचा पश्चाताप करायची वेळ येणार नाही,अशा प्रकारे राज्य सरकार काम करेल असे अश्वासित केले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा
श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद
श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी