मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणात झळकले ‘शेतकरी कर्जमुक्ती’चे पोष्टर;सुरक्षा यंत्रणांची काही काळ उडाली भंबेरी;शनी देवगाव सप्ताहस्थळी घडला प्रकार

श्रीरामपूर-नितीन शेळके‘माय बाप सरकार गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या’अशा आशयाच्या मागणीचे पोष्टर एका तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झळकावल्याने काही...

श्रीरामपूर-नितीन शेळके
‘माय बाप सरकार गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या’
अशा आशयाच्या मागणीचे पोष्टर एका तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झळकावल्याने काही काळ सुरक्षा यंत्रणा व पोलीस प्रशासन यांची धावपळ उडाली होती.लागलीच पोलीस प्रशासनाने ते पोस्टर त्या शेतकऱ्याच्या ताब्यातून काढून घेत व्यासपीठाकडे नेले.
अगदी अचानक घडलेल्या मिनिटभराच्या या प्रसंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा यंत्रणांची मात्र भंबेरी उडाली होती.श्री क्षेत्र देवगाव शनी येथील १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित होते.यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आमदार रमेश बोरणारे, विठ्ठलराव लंघे, अमोल खाताळ, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदींसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मुख्यमंत्री यांचा दौरा आणि सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मागणी संबंधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अगदी ‘अलर्ट मोड’वर होत्या.

शनी देवगाव सप्ताहात ‘माय बाप सरकार गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या’
अशा आशयाच्या मागणीचे पोष्टर एका तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झळकावले.

मुख्यमंत्री यांच्या वाहनांच्या ताफ्याच्या मार्गापासून व्यासपीठाची तसेच आजूबाजूच्या सर्व ठिकाणांची कसून तपासणी सुरक्षा यंत्रणाकडून सकाळपासूनच सुरू होती.
असे असतानाही काल्याच्या किर्तनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरू असताना ‘माय बाप सरकार गोर गरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या’या आशयाच्या मागणीचे पोष्टर घेऊन एक तरुण शेतकरी उभा राहिला.त्याने कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी केली नाही.मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी त्याने आपल्या त्या कृतीतून व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष आपल्या मागणीकडे वेधण्याचा प्रयत्न केला.अगदी मिनीटभराच्या आत हा सर्व प्रकार घडला.सुरक्षा यंत्रणानी तात्काळ शेतकऱ्याकडे धाव घेत त्याच्या हातून ते पोष्टर ताब्यात घेतले.दरम्यान सदर घटना घडत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीच्या घटक पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे.भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार या तीनही नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू,असेही त्यांनी आश्वासित केले होते.परंतु याबाबतचे आश्वासन सरकारकडून पाळले जात नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेसह राज्यातील शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या राज्यातल्या लाडक्या बहिणी व शेतकरी यांनी आम्हाला निवडून दिले असून त्यांना येणाऱ्या 5 वर्षांच्या काळात आम्हाला निवडून दिल्याचा पश्चाताप करायची वेळ येणार नाही,अशा प्रकारे राज्य सरकार काम करेल असे अश्वासित केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!