भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण...

श्रीरामपूर-
हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात होते आज ते नाहीत.त्यामुळेच आजची पिढी बिगडत चालली आहे.त्यास शिक्षण संस्था जबाबदार आहे.वाट्सअप व फेसबुक मुळे मनोविकार वाढत आहे. त्याला जबाबदार कोण असा सवाल करत, ते सुधारण्यासाठी अध्यात्म – संस्कृतीची गरज आहे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.श्री क्षेत्र शनि देवगाव सप्तकुषी येथे गोदातीरी सुरू असलेल्या सदगुरु गंगागिरी महाराज १७८ व्या अखंड हरिनाम सप्तहातील सहाव्या दिवशीच्या  प्रवचन पुष्प गुंफताना महाराज बोलत होते.  परमार्थ हे महाधन आहे, रामनाम रुपी ज्याच्याकडे आहे तो श्रीमंत आहे. जगामध्ये कोणी धनवान नाही. लक्ष्मीचा जेथे मोठेपणा चालला नाही, तिथे आपण कोण? सिकंदर जब दुनिया से चला तब दोनो हात खाली थे असे सांगत महाराज म्हणाले, जग जिंकले, कितीही संपत्ती असली तरी आपण काही घेवुन जात नाही. आशेमुळे जिवनात अनेक समस्या निर्माण होतात. आशा ही माणसाला वर्तमानात ठेवत नाही, ती भविष्यात घेवुन जाते.  

आज पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण व मोबाईलचा वाढता अतिवापर यामुळे मनुष्य दिशाहीन झाला आहे तरुण मोबाईलच्या खेळात व्यस्त झाला आहे,
तरुणाई हा समाजाचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे, त्यांनी योग्य मार्गावर चालावे यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे. आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार युवकांनी केल्यास एक संतुलित आणि यशस्वी जीवन जगण्यास मदत होईल. असे महाराज म्हणाले याप्रसंगी माजी खासदार चंद्रकांत खैरे, वैजापुरचे आमदार रमेश पा बोरणारे सर, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब,विश्व हिंदू परिषदचे सुनील धनवट,कमलाकर कोते, राजेंद्र सांळुके,मनाजी मिसाळ,कडुभाऊ काळे, बाळासाहेब कापसे बाबासाहेब चिडे रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योंगानंद महाराज, विश्वनाथ गिरीजी महाराज, अर्जुन महाराजविकम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज,यांच्यासह लाखो भाविकाची उपस्थित होते

सदगुरु गंगागिरी महाराज १७८ व्या अखंड हरिनाम सप्तहातील सहाव्या दिवशी प्रवचन पुष्प गुंफताना महंत रामगिरी महाराज.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!