श्रीरामपूर-
हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात होते आज ते नाहीत.त्यामुळेच आजची पिढी बिगडत चालली आहे.त्यास शिक्षण संस्था जबाबदार आहे.वाट्सअप व फेसबुक मुळे मनोविकार वाढत आहे. त्याला जबाबदार कोण असा सवाल करत, ते सुधारण्यासाठी अध्यात्म – संस्कृतीची गरज आहे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.श्री क्षेत्र शनि देवगाव सप्तकुषी येथे गोदातीरी सुरू असलेल्या सदगुरु गंगागिरी महाराज १७८ व्या अखंड हरिनाम सप्तहातील सहाव्या दिवशीच्या प्रवचन पुष्प गुंफताना महाराज बोलत होते. परमार्थ हे महाधन आहे, रामनाम रुपी ज्याच्याकडे आहे तो श्रीमंत आहे. जगामध्ये कोणी धनवान नाही. लक्ष्मीचा जेथे मोठेपणा चालला नाही, तिथे आपण कोण? सिकंदर जब दुनिया से चला तब दोनो हात खाली थे असे सांगत महाराज म्हणाले, जग जिंकले, कितीही संपत्ती असली तरी आपण काही घेवुन जात नाही. आशेमुळे जिवनात अनेक समस्या निर्माण होतात. आशा ही माणसाला वर्तमानात ठेवत नाही, ती भविष्यात घेवुन जाते.

आज पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण व मोबाईलचा वाढता अतिवापर यामुळे मनुष्य दिशाहीन झाला आहे तरुण मोबाईलच्या खेळात व्यस्त झाला आहे,
तरुणाई हा समाजाचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे, त्यांनी योग्य मार्गावर चालावे यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे. आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार युवकांनी केल्यास एक संतुलित आणि यशस्वी जीवन जगण्यास मदत होईल. असे महाराज म्हणाले याप्रसंगी माजी खासदार चंद्रकांत खैरे, वैजापुरचे आमदार रमेश पा बोरणारे सर, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब,विश्व हिंदू परिषदचे सुनील धनवट,कमलाकर कोते, राजेंद्र सांळुके,मनाजी मिसाळ,कडुभाऊ काळे, बाळासाहेब कापसे बाबासाहेब चिडे रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योंगानंद महाराज, विश्वनाथ गिरीजी महाराज, अर्जुन महाराजविकम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज,यांच्यासह लाखो भाविकाची उपस्थित होते
