बचत गटाच्या चळवळीने महीलांना स्वयपूर्ण आणि आत्मनिर्भर केले-मा. खा.डाॅ.विखे पाटील;महीला बचत गटाना पापड उत्पादन मशिन आणि अनुदानाचे वाटप

श्रीरामपूर-महिला बचत गटाची चळवळ केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीशील व्हावी ,चळवळीशी जोडल्या गेलेल्या महीला स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होत असल्याचे प्रतिपादन...

श्रीरामपूर-
महिला बचत गटाची चळवळ  केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीशील व्हावी ,चळवळीशी जोडल्या गेलेल्या महीला  स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होत असल्याचे प्रतिपादन डॉ सुजय विखे पाटील यांनी केले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला बचत गटांना पापड मेकिंग मशीन  वितरण डॉ विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.श्रीरामपूर तालुक्यातील महिला बचत गटांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी भविष्यात आणखी काही उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिठाच्या गिरण्या, मसाला यंत्र, वजन काटे, पॅकिंग मशीन, पापड मेकिंग मशीन यासह खेळते भांडवल व शासकीय योजनांअंतर्गत कर्जाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून, श्रीरामपूर तालुका कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.यावेळी मा सभापती दीपक पटारे, संचालक गिरीधर आसने,तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, भाऊसाहेब बांदरे, संजय फंड,अभिषेक खंडागळे आदींसह अनेक जण उपस्थित होते.

श्रीरामपूर तालुक्यातील महिला बचत गटांना आर्थिक सशक्तीकरणासाठी मा खा सुजय विखे पाटील यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात महिला बचत गटांना व्यवसायासाठी उपयुक्त वस्तूंचे आणि कर्जाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.तसेच महायुतीचे शहर पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते व विविध गटांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, मागील दोन वर्षांमध्ये सुमारे १०० हून अधिक गटांना पिठगिरण्या, मसाला यंत्रे, शेवया मशीन आदींचे वाटप करण्यात आले आहे. आता पापड मेकिंगयंत्रे वाटप झाल्यानंतर त्याचा वापर योग्य प्रकारे होत आहे की नाही, याकडे लक्ष ठेवले जाईल.श्रीरामपूर तालुक्यातील सामाजिक आणि आर्थिक विसंगतीवरही त्यांनी भाष्य करत सांगितले की, अनेक गरीब कुटुंबे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, त्यांना शासकीय धान्य मिळत नाही, मात्र गाड्या आणि बंगले असलेले लोक योजनेचा लाभ घेत आहेत. ही अन्यायकारक परिस्थिती बदलणे आवश्यक असून, प्रत्येक गावात शिबिरे घेऊन गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून दिला जाईल.कार्यक्रमात त्यांनी श्रीरामपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी शरदभाऊ नवले यांची निवड जाहीर केली. यापुढे गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राजकीय कार्यक्रमांमध्ये वेळेचे भान ठेवून काम करण्याची नवी कार्यसंस्कृती रुजवावी, असे सांगत त्यांनी कार्यक्रम एका तासात पूर्ण झाला पाहिजे, याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहिलेल्या सर्व माता-भगिनींचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले.कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सुजय विखे पाटील यांनी १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राहता तालुक्यातील अस्तगाव माथ्यावर आयोजित प्रदीप मिश्रा महाराजांच्या शिवपुराण कथेसाठी उपस्थित महिलांना निमंत्रण दिले. महिलांसाठी विशेष नोंदणी करून त्यांना कार्यक्रमात पुढच्या रांगेत बसवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!