कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार...

श्रीरामपूर-

‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक येथे कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालयाची स्थापना करून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाच्या निमित्ताने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कार्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.याप्रसंगी ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.कार्यालयाचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगनजी भुजबळ, मंत्री श्री. नरहरीजी झिरवाळ, मंत्री श्री. माणिकरावजी कोकाटे, खासदार श्री. भास्करराव भगरे, आमदार श्री. दिलीप बनकर, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार श्री. राहुल ढिकले, आमदार श्री. आशुतोष काळे, श्री. काशिनाथ दाते, आमदार श्री. अमोल खताळ, आमदार श्री. विठ्ठलराव लंघे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातुन दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने जलसंपदा विभागाने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे.‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांना नवसंजीवनी मिळणार आहे.जलसंधारण, शेती, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण जीवनमान उन्नतीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. हे पाऊल म्हणजे “एक महाराष्ट्र, दुष्काळमुक्त महाराष्ट्र” या ध्येयाच्या दिशेने घेतलेली ठोस वाटचाल आहे,असेही ते शेवटी म्हणाले.

नाशिक येथे कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालयाची स्थापना करून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!