श्रीरामपूर-
‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक येथे कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालयाची स्थापना करून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाच्या निमित्ताने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कार्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.याप्रसंगी ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.कार्यालयाचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगनजी भुजबळ, मंत्री श्री. नरहरीजी झिरवाळ, मंत्री श्री. माणिकरावजी कोकाटे, खासदार श्री. भास्करराव भगरे, आमदार श्री. दिलीप बनकर, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार श्री. राहुल ढिकले, आमदार श्री. आशुतोष काळे, श्री. काशिनाथ दाते, आमदार श्री. अमोल खताळ, आमदार श्री. विठ्ठलराव लंघे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातुन दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने जलसंपदा विभागाने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे.‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांना नवसंजीवनी मिळणार आहे.जलसंधारण, शेती, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण जीवनमान उन्नतीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. हे पाऊल म्हणजे “एक महाराष्ट्र, दुष्काळमुक्त महाराष्ट्र” या ध्येयाच्या दिशेने घेतलेली ठोस वाटचाल आहे,असेही ते शेवटी म्हणाले.
