गोदावरीच्या पवित्र तिरावर ज्ञानदान,अन्नदानाने भाविकांची त्रुप्ती-महंत रामगिरी महाराज;गंगागिरी महाराज 178 वा सप्ताह-पुष्प पहिले

श्रीरामपूर-प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दंडकारण्य भुमिमध्ये गंगागिरी महाराज यांचा सप्ताह होत आहे गोदावरी तीरी आपण प्रयागराज मंहाकुभाची अनभुती घेत आहेत...

श्रीरामपूर-
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दंडकारण्य भुमिमध्ये गंगागिरी महाराज यांचा सप्ताह होत आहे  गोदावरी तीरी आपण प्रयागराज मंहाकुभाची अनभुती घेत आहेत सप्तहाच्या माध्यमातून भक्ती,ज्ञान व अन्नदानाचा एकप्रकारे महायज्ञच असतो व आपण सर्व त्या परमात्म्यासाठी हा तपस्या यज्ञ करत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.श्री क्षेत्र शनिदेव गाव शिवारातील गोदातीरी माळावर आयोजित सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज १७८व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीचे  दिवशीचे प्रथम प्रवचन पुष्प गुंफतानी ते बोलत होते .सुमारे तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत भगवतगितेच्या 11 व्या अध्यायातला  54 श्लोकावर बोलताना महाराज म्हणाले की,.मन बुद्धीच्या पलीकडे असते,प्रत्येकाच्या आवडी भिन्न ,संस्कार भिन्न आहे ,जगातील सर्वात पवित्र वस्तू ज्ञान आहे ज्ञान हे प्राप्त करता येत नसून ते अंतरंगातून प्रकट होत असते.हे शास्त्र सांगते,परमात्मा हा अणु- रेणू पेक्षा लहान तर विचार केल्यास आकाशा एवढा मोठा आहे .बुद्धी व ज्ञानाची देवता असलेल्या गणेशाबद्दल समाजात गैरसमज पसरविले जात आहे .परंतु सबका मलीक एकच परमात्मा आहे.

दुसऱ्याचे ऐकून घेण्याची क्षमता ज्यांच्यात नसते ते जीवनात कधीच मोठे होऊ शकत नाही .ज्ञान प्राप्ती साठी चित्तशुध्दीची गरज असते,त्यासाठी कामना विरहीत मन करावे ,मनाला सुमन बनवावे म्हणजे परमात्मा आपल्या आंतरंगात वास करेल ,प्रत्येक जीवाच्या ह्दयात राहून भगवंत त्याच्या कर्मानुसार त्याला फिरवत असतो,असे महाराज म्हणाले . कली युगात आपल्याला वनात जाऊन हजारो वर्ष तप करणे शक्य नसते म्हणूनच सर्वसामान्य जिवाने सप्ताहातील ज्ञानदान यज्ञदान अन्नदान या परंपरा अनुभवल्या पाहिजे त्यासाठी योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरी महाराज यांच्या सानिध्यात यावे लागेल या गोदातीरी प्रमुख प्रभू रामचंद्राने अभयारण्यात वास्तव्य केले त्याच गोदा दामात योगिराज गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरी महाराज यासारख्या संताच्या सानिध्यात आपण ज्ञान यज्ञ अन्नदान यासारख्या परंपरा पुढे नेत आहोत येथील आनंद भक्ती अध्यात्म ज्ञानदान अन्नदान भक्तिमय वातावरण पाहून पंढरीचा पांडुरंग ही आज पंढरीत  नसून या ठिकाणीच वास करत असेल असे महाराज म्हणाले.याप्रसंगी गणेश आश्रमाचे विष्णु गिरी महाराज,ज्ञांनानंदगिरीजी महाराज,चैतन्यनंदगिरीजी महाराज,विश्र्वनाथगिरीजी महाराज,राजेश्र्वरगिरीजी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज,यांच्यासह लाखो भाविकांची उपस्थिती होती.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!