आ.ओगलेंनी बालिशपणा बंद करावा;अन्यथा डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळही येऊ देणार नाही;आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा इशारा

श्रीरामपूर-
आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकरी जनता आमदार हेमंत ओगले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळही येऊ देणार नाही,असा इशाराच बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमराज बागुल,सचिन ब्राह्मणे, प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ यांनी दिला आहे.
शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे  सर्वेक्षण करण्यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे बैठकीत सक्त आदेश दिला होता.त्या आदेशाच्या अनुषंगाने आज दिनांक 31 जुलै रोजी बारा वाजता वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी निलेश रोटे उपाधीक्षक भुमिअभिलेख रवींद्र खरोटे नगर अभियंता सूर्यकांत गवळी अधिकारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागेची स्थळ पाहणी करण्यासाठी येत असता आमदार हेमंत ओगले यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलून घेतले.त्यानंतर त्यांना आमदार ओगलेनी त्यांच्या सरकारी गाडीतून उतरून आंबेडकरी जनतेला देखावा करण्यासाठी स्वतःच्या गाडीत बसून डॉ.आंबेडकर पुतळ्याकडे  घेऊन आले. तिथे अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी करू न देता व्हिडिओ शूटिंग तसेच  फोटोसेशन करून माध्यमांना बाईट देऊन जणू काही आपणच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परवानगीसाठी पुढाकार घेत आहोत असा देखावा करण्याचा प्रयत्न करून निघून गेले. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले सुभाष त्रिभुवन, भीमराज बागुल,सचिन ब्राह्मणे, प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ या झालेल्या प्रकारामुळे आमदार हेमंत ओगलेंचा तीव्र निषेध केला.त्यानंतर संबंधित अधिकारी पुन्हा दोन तासाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन स्थळपाहणी करून जागा निर्वाणीकरण झाल्याबाबतचा अहवाल शासनाकडे सुपूर्त केला आहे.त्यामुळे जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला. त्याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा  पूर्णाकृती बसवण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पा. यांचे युद्धपातळीवरून काम चालू असून यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लक्ष घालून त्यांचे स्वीय सहाय्यक अंजाबापू गोल्हार, पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी गेली सात-आठ महिन्यापासून अनेक अडचणी दूर करून पुतळ्याच्या जागेचे काम प्रगतीपथावर आणले आहे.यावेळी मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, अंजाबापू गोल्हार, श्रीनिवास  बिहानी, संतोष मोकळ, चरण त्रिभुवन, दादासाहेब बनकर, संजय रूपटक्के, अमोल काळे, बाळासाहेब हिवराळे, विशाल सुरडकर, भाऊसाहेब खरात, दत्ता खेमनर, भैय्या भिसे,संजय गांगड, सतीश सौदागर,बंडू शिंदे, संजय बोरगे आदी उपस्थित होते.

जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमवेत सुभाष त्रिभुवन,
यावेळी मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, अंजाबापू गोल्हार, श्रीनिवास  बिहानी आदी.

Leave a Comment

संबंधित बातम्या

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

आ.ओगलेंनी बालिशपणा बंद करावा;अन्यथा डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळही येऊ देणार नाही;आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा इशारा

श्रीरामपूर-आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकरी जनता आमदार हेमंत ओगले यांना डॉ.

Latest News

Trending News