हरिनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला;देवगाव शनीच्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ; मिरवणुक व शोभायात्रेने फेडले डोळ्यांचे पारणे

श्रीरामपूर –योगीराज सद्‌गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज गोदावरीधाम (सरला) चे मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी...

श्रीरामपूर –
योगीराज सद्‌गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज गोदावरीधाम (सरला) चे मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मिरवणुकीने व शोभायात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. ही मिरवणूक सकाळी ११.३० वाजता बाजाठाण येथील श्री आशुतोष महादेव मंदिरातून निघाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात, जयघोषात आणि विविध रंगीबेरंगी चित्ररथांच्या साथीत ही मिरवणूक सप्ताहस्थळी पोहोचली.या मिरवणुकीत सप्तक्रोशीतील तसेच पंचक्रोशीतील शाळा, प्राथमिक विद्यालये, तरुण मंडळे, भक्त-भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रत्येक गावाने आपली अध्यात्मिक समर्पण भावना वेगवेगळ्या चित्ररथांतून सादर करत हरिनाम सप्ताहाच्या स्वागतात योगदान दिले. भामठाण येथील वारकरी भजनी मंडळींनी सरला बेट ते अवलगाव दरम्यान मोटारसायकल रॅलीही काढली.

१७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज गोदावरीधाम (सरला) चे मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मिरवणुकीने व शोभायात्रेने उत्साहात प्रारंभ झाला.

सप्ताहस्थळी पोहोचताच “गंगागिरी महाराज की जय”, “रामगिरी महाराज की जय” चा जयघोष झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार रमेश बोरणारे, विश्वासंत मधुकर महाराज, सप्ताहाचे उपाध्यक्ष हरिशरण महाराज, संदीप महाराज, योगानंद महाराज, माऊली महाराज, रंजळे महाराज, मधुसूदन महाराज, बहिरट महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, पंकज ठोंबरे, बाबासाहेब चिडे, अविनाश गलांडे, ज्ञानेश्वर व वंदना मुरकुटे यांचाही विशेष सहभाग होता.कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रामगिरी महाराजांचे संतपुजन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, “१७७ वा सप्ताह आमच्याकडे झाला. महाराजांनी जे सांगितले, ते पूर्णत्वास नेले. आज १७८ व्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सात गावांनी उत्तम नियोजन करून उत्कृष्ट आदर्श घालून दिला आहे.”

महिलांचा, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा या सप्ताहाची विशेषताच आहे, असे सांगून मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या शेतीला बळकटी द्यावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.आमदार रमेश बोरणारे यांनी सप्ताहाच्या आयोजनाचे कौतुक करत सहभागी गावांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक मधु महाराज यांनी केले.

कमलपूर विद्यालय व त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय,घोगरगाव यांनीही शोभायात्रेत सहभाग नोंदवला
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!