हरिनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला;देवगाव शनीच्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ; मिरवणुक व शोभायात्रेने फेडले डोळ्यांचे पारणे

श्रीरामपूर –
योगीराज सद्‌गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज गोदावरीधाम (सरला) चे मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मिरवणुकीने व शोभायात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. ही मिरवणूक सकाळी ११.३० वाजता बाजाठाण येथील श्री आशुतोष महादेव मंदिरातून निघाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात, जयघोषात आणि विविध रंगीबेरंगी चित्ररथांच्या साथीत ही मिरवणूक सप्ताहस्थळी पोहोचली.या मिरवणुकीत सप्तक्रोशीतील तसेच पंचक्रोशीतील शाळा, प्राथमिक विद्यालये, तरुण मंडळे, भक्त-भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रत्येक गावाने आपली अध्यात्मिक समर्पण भावना वेगवेगळ्या चित्ररथांतून सादर करत हरिनाम सप्ताहाच्या स्वागतात योगदान दिले. भामठाण येथील वारकरी भजनी मंडळींनी सरला बेट ते अवलगाव दरम्यान मोटारसायकल रॅलीही काढली.

१७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज गोदावरीधाम (सरला) चे मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मिरवणुकीने व शोभायात्रेने उत्साहात प्रारंभ झाला.

सप्ताहस्थळी पोहोचताच “गंगागिरी महाराज की जय”, “रामगिरी महाराज की जय” चा जयघोष झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार रमेश बोरणारे, विश्वासंत मधुकर महाराज, सप्ताहाचे उपाध्यक्ष हरिशरण महाराज, संदीप महाराज, योगानंद महाराज, माऊली महाराज, रंजळे महाराज, मधुसूदन महाराज, बहिरट महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, पंकज ठोंबरे, बाबासाहेब चिडे, अविनाश गलांडे, ज्ञानेश्वर व वंदना मुरकुटे यांचाही विशेष सहभाग होता.कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रामगिरी महाराजांचे संतपुजन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, “१७७ वा सप्ताह आमच्याकडे झाला. महाराजांनी जे सांगितले, ते पूर्णत्वास नेले. आज १७८ व्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सात गावांनी उत्तम नियोजन करून उत्कृष्ट आदर्श घालून दिला आहे.”

महिलांचा, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा या सप्ताहाची विशेषताच आहे, असे सांगून मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या शेतीला बळकटी द्यावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.आमदार रमेश बोरणारे यांनी सप्ताहाच्या आयोजनाचे कौतुक करत सहभागी गावांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक मधु महाराज यांनी केले.

कमलपूर विद्यालय व त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय,घोगरगाव यांनीही शोभायात्रेत सहभाग नोंदवला

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News