हरिनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला;देवगाव शनीच्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ; मिरवणुक व शोभायात्रेने फेडले डोळ्यांचे पारणे

श्रीरामपूर –योगीराज सद्‌गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज गोदावरीधाम (सरला) चे मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी...

श्रीरामपूर –
योगीराज सद्‌गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज गोदावरीधाम (सरला) चे मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मिरवणुकीने व शोभायात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. ही मिरवणूक सकाळी ११.३० वाजता बाजाठाण येथील श्री आशुतोष महादेव मंदिरातून निघाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात, जयघोषात आणि विविध रंगीबेरंगी चित्ररथांच्या साथीत ही मिरवणूक सप्ताहस्थळी पोहोचली.या मिरवणुकीत सप्तक्रोशीतील तसेच पंचक्रोशीतील शाळा, प्राथमिक विद्यालये, तरुण मंडळे, भक्त-भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रत्येक गावाने आपली अध्यात्मिक समर्पण भावना वेगवेगळ्या चित्ररथांतून सादर करत हरिनाम सप्ताहाच्या स्वागतात योगदान दिले. भामठाण येथील वारकरी भजनी मंडळींनी सरला बेट ते अवलगाव दरम्यान मोटारसायकल रॅलीही काढली.

१७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज गोदावरीधाम (सरला) चे मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मिरवणुकीने व शोभायात्रेने उत्साहात प्रारंभ झाला.

सप्ताहस्थळी पोहोचताच “गंगागिरी महाराज की जय”, “रामगिरी महाराज की जय” चा जयघोष झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार रमेश बोरणारे, विश्वासंत मधुकर महाराज, सप्ताहाचे उपाध्यक्ष हरिशरण महाराज, संदीप महाराज, योगानंद महाराज, माऊली महाराज, रंजळे महाराज, मधुसूदन महाराज, बहिरट महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, पंकज ठोंबरे, बाबासाहेब चिडे, अविनाश गलांडे, ज्ञानेश्वर व वंदना मुरकुटे यांचाही विशेष सहभाग होता.कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रामगिरी महाराजांचे संतपुजन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, “१७७ वा सप्ताह आमच्याकडे झाला. महाराजांनी जे सांगितले, ते पूर्णत्वास नेले. आज १७८ व्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सात गावांनी उत्तम नियोजन करून उत्कृष्ट आदर्श घालून दिला आहे.”

महिलांचा, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा या सप्ताहाची विशेषताच आहे, असे सांगून मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या शेतीला बळकटी द्यावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.आमदार रमेश बोरणारे यांनी सप्ताहाच्या आयोजनाचे कौतुक करत सहभागी गावांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक मधु महाराज यांनी केले.

कमलपूर विद्यालय व त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय,घोगरगाव यांनीही शोभायात्रेत सहभाग नोंदवला
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!