सप्ताह सनातन हिंदू धर्म परंपरेच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण-जलसंपदा मंत्री विखे पाटील; १७८ व्या हरीनाम सप्ताहाचे शनिदेवगाव येथे ध्वजारोहण

श्रीरामपूर-सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा सनातन हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरेच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण आहे.या अध्यात्माच्या अधिष्ठानामागे समाजाने उभ्या केलेल्या...

१७८ व्या हरीनाम सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरीजी महाराज व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

श्रीरामपूर-
सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा सनातन हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरेच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण आहे.या अध्यात्माच्या अधिष्ठानामागे समाजाने उभ्या केलेल्या शक्तीमध्येच सप्ताहाचे यश असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.गुरूवर्य गंगागिरीजी महाराजांच्या १७८ व्या हरीनाम सप्ताहाचे आयोजन श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील शनिदेवगाव येथे करण्यात आले आहे.सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी खा.संदिपान भुमरे,आ.रमेश बोरनारे, सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष महंत हरीशरण गिरीजी महाराज, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर,मा आ. भानूदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, प्रभाकर शिंदे,मा. सभापती दिपक पटारे,अविनाश गलांडे,पंकज ठोंबरे,तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,प्रभाकर शिंदे,जितेंद्र छाजेड,गिरीधर आसने,ऍड अजित काळे,कडूभाऊ काळे
यांच्यासह वारकरी सांप्रदायातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री विखे पाटील म्हणाले की,या सप्ताहाच्या परंपरेची वाटचाल द्विशताब्दीकडे सुरू आहे.जगाच्या पाठीवर अध्यात्मिक क्षेत्रातील या सोहळ्याने अनेक विक्रम केले.

गुरूवर्य गंगागिरीजी महाराजांच्या १७८ व्या हरीनाम सप्ताहानिमित्त मार्गदर्शन करताना ना. राधाकृष्ण विखे पाटील

केवळ ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करीत भक्ती रसामध्ये एकरुप होणारी समाजशक्ती हेच या सप्ताहाचे यश आहे.महंत रामगिरीजी महाराज हिंदू धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी  ठाम भूमिका घेवून जेव्हा बोलतात तेव्हा समाजाने सुध्दा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली पाहीजे.यंदाचा सप्ताह ऐतिहासिक होण्याकरीता प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे.परमार्थाच्या यज्ञात आहुती देण्यासाठी प्रत्येकाने एक पाउल पुढे टाकण्याचे आवाहन करून मंत्री विखे पाटील यांनी शनिदेवगाव गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचै काम सप्ताह सुरू होण्यापुर्वी पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण दिले आहे. शनिदेवगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामास आपण मंजूरी दिली आहे.यासाठी लागाणारा 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देवून बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना लाभ होणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाला जाताना मंत्री विखे पाटील यांनी कमलपूर येथील दुरुस्ती करण्यात आलेल्या पुलाच्या कामाची पाहाणी करून कठड्याचे काम त्वरित पूर्ण आदेश दिले आहेत.
याप्रसंगी आ.रमेश बोरनारे यांनी तीन जिल्ह्यांच्या सीमेवर होणारा सप्ताह वैजापूर तालुक्यात घेण्याचे भाग्य मिळाले असून मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने या भागातील व पुलावरील रस्ता आणि संरक्षण कठड्याचे काम मार्गी लागले असल्याचे सांगितले.या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महंत रामगिरीजी महाराज यांनी नारायणगिरीजी महाराजांनी शनिदेवगाव येथे सप्ताह घेण्याची व्यक्त केलेली इच्छा यावर्षी पूर्ण होत असल्याचे सांगून सप्ताहाला सहकार्य करणार्या देणगीदारांची नाव जाहीर केली.आभार महंत हरीशरण गिरीजी महाराज यांनी मानले.

बंधाऱ्याच्या 250 कोटींच्या कामास मंजुरी
शनिदेवगाव गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे सप्ताह सुरू होण्यापुर्वी पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण दिले आहेत. तसेच शनिदेवगाव येथील उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामास आपण मंजूरी दिली आहे.यासाठी लागाणारा 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देवून बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना लाभ होणार असल्याचे सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!