राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना ‘बारामती हिंदू धर्मरक्षक’ पुरस्कार;ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान

श्रीरामपूर:
बारामती, इंदापूर या पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या तालुक्यांमध्ये हिंदुत्व जागवण्याचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना ‘बारामती हिंदू धर्मरक्षक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्ताने बारामती येथे झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समितीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती कार्यक्रम बारामती नगरपरिषदे समोरील शारदा प्रांगणात मोठ्या थाटात संपन्न झाला. बारामती, भिगवण आणि इंदापूर तालुक्यातून असंख्य धनगर समाज बांधव याप्रसंगी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण धर्मरक्षक सागर बेग यांना करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची सुबक मूर्ती देऊन सागर बेग यांना यावेळी गौरवण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे भाषण झाले. तर इतर नियोजित कार्यक्रमामुळे जत विधानसभेचे आमदार व धनगर समाजाचा बुलंद आवाज गोपीचंद पडळकर यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही.कार्यक्रम यशस्वितेसाठी बारामती सकल हिंदू समाज व धनगर बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले तर दौंड विधानाभमतदारसंघाचे आमदार राहुल कुल, पुणे कॉन्टोमेंट विधानसभा आमदार सुनील कांबळे, विधानपरिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर, माळशिरसचे माजी आमदार रामभाऊ सातपुते, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप दादा मोरे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे राहाता तालुकाध्यक्ष मदन आप्पा मोकाटे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते
‘बारामती हिंदू धर्मरक्षक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News