छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद शिगेला;बेकायदेशीर पुतळा बसवणाऱ्यांवर कारवाई करा-चित्ते;शहराध्यक्ष छाजेड आता शिवाजी चौकात पुतळा बसविणार का?

श्रीरामपूर :
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात बसविण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी असतानाही शिवाजी महाराजांचा पुतळा भाजी मार्केटमध्ये घाईघाईत बसविण्याचा जो प्रयत्न केला गेला तो बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे बेकायदेशीर पुतळा बसविणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, या आशयाचे प्रशासनाला आम्ही लवकरच निवेदन देऊन मागणी करणार असल्याची माहिती भाजपाचे प्रकाश चित्ते यांनी दिली.
प्रकाश चित्ते यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली त्या पत्रकार परिषदेत भाजपाचे शशिकांत कडूस्कर, राजेंद्र कांबळे, संजय पांडे, सुरेश सोनवणे, अभिजीत कुलकर्णी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री चित्ते म्हणाले की, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाहेरून श्रीरामपूरात पाठवलेले त्यांचे हस्तक यांनी केलेले घाणेरडे व घृणस्पद कृत्य लपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाचा गैरवापर केला जात आहे.त्याचा आम्ही निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच झाला पाहिजे अशी अनेक वर्षापासूनची आमची मागणी होती. पालकमंत्री नामदार विखे व महंत रामगिरी महाराज त्यांच्या हस्ते शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा घाट घालण्यात आला. शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकामध्ये नगरपरिषदेच्या प्रस्तावा नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास बांधकाम विभागाची 1 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रानुसार आधीच परवानगी मिळालेली होती. तरीही मुस्लिम मतांच्या टक्क्यासाठी हा पुतळा शिवाजी चौकात न बसवता नेहरू भाजी मार्केट परिसरात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नेहरू भाजी मार्केटमध्ये जागेत पुतळा बसविण्यात आला तो बेकायदेशीर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात बसण्याची बांधकाम विभागाची परवानगी असताना ती परवानगी लपविण्यात आली. प्रशासनाने ही परवानगी नाकारून बेकायदेशीरपणे जागेत पुतळा बसविण्यात आला. बेकायदेशीरपणे पुतळा बसविण्यास कारणीभूत असलेल्या सर्वच लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन आम्ही प्रशासनाला देणार आहोत. भविष्यात आमची सत्ता आली तर आम्ही हा पुतळा पुन्हा शिवाजी चौकात स्थलांतरित करू असे आश्वासने श्री चित्ते यांनी दिले.
यावेळी बोलताना राजेंद्र कांबळे म्हणाले की शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच झाला पाहिजे अशी आमची मागणी ठाम असताना त्यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांनी आम्हाला आवाहन केले होते की जर सार्वजनिक बांधकाम खात्याने परवानगी दिली तर हा पुतळा शिवाजी चौकात बसविण्यास आमचा पाठिंबा राहील.शिवाजी चौकात पुतळा बसविणे बाबत चा सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘ना हरकत’ दाखला आलेला आहे.भाजप शहराध्यक्ष छाजेड यांना आमचे आव्हान आहे की,आता हा पुतळा शिवाजी चौकात तुम्ही बसविणार का? असाही सवाल राजेंद्र कांबळे यांनी शेवटी केला.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News