ॲट्रॉसिटी गुन्ह्याबाबतच्या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करा;दिपाली व प्रतिक चित्ते यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-
श्रीरामपूरमधील भाजपाचे हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश चित्ते यांच्या सुविद्य पत्नी सौ. दिपाली चित्ते व प्रतिक चित्ते यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली.संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कडे केली.यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, संबंधित फिर्यादीने रात्री पावणेआठ वाजता दिलेल्या एका फिर्यादीमध्ये ना प्रकाश चित्ते यांचे नाव होते, ना जातीयवाचक शब्दांचा उल्लेख होता. मात्र, त्यानंतर रात्री एक वाजता पुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुसऱ्या फिर्यादीत आठ-दहा दिवसांपूर्वीच्या काल्पनिक घटनांचा उल्लेख करून जातीय शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.पोलिसांनी कुठलीही प्राथमिक चौकशी किंवा शहानिशा न करता तातडीने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारातून प्रशासनावर राजकीय दबाव होता तसेच यामागे मोठे कटकारस्थान होते हे स्पष्ट होते,असे सौ. दिपाली चित्ते व प्रतिक चित्ते यांनी सांगितले.त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. जेणेकरून सत्य जनतेसमोर येईल अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

प्रकाश चित्ते यांच्या पत्नी दिपाली चित्ते व प्रतिक चित्ते यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News