धार्मिक कार्यक्रमासाठी आलोय,त्याबद्दलच विचारा-कृषिमंत्री कोकाटे;पत्रकारांनी गराडा घातल्यावर कृषीमंत्री कोकाटेंचा सावध पवित्रा

श्रीरामपूर-नितीन शेळके‘राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद’ असे समीकरणच जणू काही गेल्या काही दिवसांपासून बनले आहे. त्यामुळे कोकाटे हे नेहमी त्यांच्या...

श्रीरामपूर-नितीन शेळके
‘राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद’ असे समीकरणच जणू काही गेल्या काही दिवसांपासून बनले आहे. त्यामुळे कोकाटे हे नेहमी त्यांच्या विरोधकांच्या हिटलिस्टवर राहिलेले आहेत.वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमी अडचणीत येत राहिले.
विधिमंडळात रमी खेळण्याचा त्यांचा समोर आलेला कथित व्हिडीओ असो की आपल्याच कृषी खात्याला ‘ओसाड गावची पाटीलकी’ असे संबोधणे असो किंवा अगदी कालपरवा आपल्याच सरकारला ‘भिकारी’ म्हणून हिणवणे असो,कृषीमंत्री कोकाटे हे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेलेच राहिले. त्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचिही चांगलीच नाराजी ओढवून घेतली. ती इतकी की कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामाच घेतला जाईल, आणि त्यांना दुसरे एखादे खाते दिले जाईल किंवा अगदीच जबाबदारीतुन ‘मोकळे’ केले जाईल इथपर्यंत चर्चा माध्यमातून रंगायला लागल्या. परंतु या सर्व वादग्रस्त घडामोडींनंतर खुद्द कृषीमंत्री कोकाटे यांनीच अजित पवार यांच्यापुढे पडदा टाकून दिलगिरी व्यक्त केल्याचे बोलले जाते.

देवगाव शनी येथील 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे.

त्यानंतर कोकाटे हे आज थेट मुंबईहून शनी देवगाव (ता. वैजापूर) येथे 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले होते. सहाजिकच कृषिमंत्री कोकाटे यांना पत्रकारांचा गराडा पडला. परंतु त्यांनी आज अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त करत मी महंत रामगिरी महाराज यांनी दिलेल्या निमंत्रणावरून मी येथे आलो आहे आणि हा धार्मिक सोहळा आहे तेव्हा आपण (पत्रकार) मला त्याबद्दलच प्रश्न विचारा, अशी विनंती केली.यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, मागील वर्षी माझ्या मतदारसंघात पांचाळे येथे १७७ व्या सप्ताहाचे आयोजन केले गेले होते. सालाबादप्रमाणे यंदा १७८ व्या सप्ताहासाठी मला महंत रामगिरी महाराज यांनी वैयक्तिक निमंत्रण दिले होते. त्यामुळे या ठिकाणी येणे क्रमप्राप्त होते.आमच्या वारकरी संप्रदायाचे सप्ताह हे श्रद्धास्थान आहे.लाखो भाविक याठिकाणी येतात.यास अनन्यसाधारण असे महत्व आहे.माझे येथे येणे झाले म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.येथील आ. रमेश बोरणारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सर्वांच्या सहकार्याने नक्की यशस्वी होईल,असेही कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे शेवटी म्हणाले.

कृषीमंत्री ना.माणिकराव कोकाटे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!