धार्मिक कार्यक्रमासाठी आलोय,त्याबद्दलच विचारा-कृषिमंत्री कोकाटे;पत्रकारांनी गराडा घातल्यावर कृषीमंत्री कोकाटेंचा सावध पवित्रा

श्रीरामपूर-नितीन शेळके‘राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद’ असे समीकरणच जणू काही गेल्या काही दिवसांपासून बनले आहे. त्यामुळे कोकाटे हे नेहमी त्यांच्या...

श्रीरामपूर-नितीन शेळके
‘राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद’ असे समीकरणच जणू काही गेल्या काही दिवसांपासून बनले आहे. त्यामुळे कोकाटे हे नेहमी त्यांच्या विरोधकांच्या हिटलिस्टवर राहिलेले आहेत.वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमी अडचणीत येत राहिले.
विधिमंडळात रमी खेळण्याचा त्यांचा समोर आलेला कथित व्हिडीओ असो की आपल्याच कृषी खात्याला ‘ओसाड गावची पाटीलकी’ असे संबोधणे असो किंवा अगदी कालपरवा आपल्याच सरकारला ‘भिकारी’ म्हणून हिणवणे असो,कृषीमंत्री कोकाटे हे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेलेच राहिले. त्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचिही चांगलीच नाराजी ओढवून घेतली. ती इतकी की कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामाच घेतला जाईल, आणि त्यांना दुसरे एखादे खाते दिले जाईल किंवा अगदीच जबाबदारीतुन ‘मोकळे’ केले जाईल इथपर्यंत चर्चा माध्यमातून रंगायला लागल्या. परंतु या सर्व वादग्रस्त घडामोडींनंतर खुद्द कृषीमंत्री कोकाटे यांनीच अजित पवार यांच्यापुढे पडदा टाकून दिलगिरी व्यक्त केल्याचे बोलले जाते.

देवगाव शनी येथील 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे.

त्यानंतर कोकाटे हे आज थेट मुंबईहून शनी देवगाव (ता. वैजापूर) येथे 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले होते. सहाजिकच कृषिमंत्री कोकाटे यांना पत्रकारांचा गराडा पडला. परंतु त्यांनी आज अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त करत मी महंत रामगिरी महाराज यांनी दिलेल्या निमंत्रणावरून मी येथे आलो आहे आणि हा धार्मिक सोहळा आहे तेव्हा आपण (पत्रकार) मला त्याबद्दलच प्रश्न विचारा, अशी विनंती केली.यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, मागील वर्षी माझ्या मतदारसंघात पांचाळे येथे १७७ व्या सप्ताहाचे आयोजन केले गेले होते. सालाबादप्रमाणे यंदा १७८ व्या सप्ताहासाठी मला महंत रामगिरी महाराज यांनी वैयक्तिक निमंत्रण दिले होते. त्यामुळे या ठिकाणी येणे क्रमप्राप्त होते.आमच्या वारकरी संप्रदायाचे सप्ताह हे श्रद्धास्थान आहे.लाखो भाविक याठिकाणी येतात.यास अनन्यसाधारण असे महत्व आहे.माझे येथे येणे झाले म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.येथील आ. रमेश बोरणारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सर्वांच्या सहकार्याने नक्की यशस्वी होईल,असेही कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे शेवटी म्हणाले.

कृषीमंत्री ना.माणिकराव कोकाटे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!