धार्मिक कार्यक्रमासाठी आलोय,त्याबद्दलच विचारा-कृषिमंत्री कोकाटे;पत्रकारांनी गराडा घातल्यावर कृषीमंत्री कोकाटेंचा सावध पवित्रा

श्रीरामपूर-नितीन शेळके
‘राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद’ असे समीकरणच जणू काही गेल्या काही दिवसांपासून बनले आहे. त्यामुळे कोकाटे हे नेहमी त्यांच्या विरोधकांच्या हिटलिस्टवर राहिलेले आहेत.वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमी अडचणीत येत राहिले.
विधिमंडळात रमी खेळण्याचा त्यांचा समोर आलेला कथित व्हिडीओ असो की आपल्याच कृषी खात्याला ‘ओसाड गावची पाटीलकी’ असे संबोधणे असो किंवा अगदी कालपरवा आपल्याच सरकारला ‘भिकारी’ म्हणून हिणवणे असो,कृषीमंत्री कोकाटे हे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेलेच राहिले. त्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचिही चांगलीच नाराजी ओढवून घेतली. ती इतकी की कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामाच घेतला जाईल, आणि त्यांना दुसरे एखादे खाते दिले जाईल किंवा अगदीच जबाबदारीतुन ‘मोकळे’ केले जाईल इथपर्यंत चर्चा माध्यमातून रंगायला लागल्या. परंतु या सर्व वादग्रस्त घडामोडींनंतर खुद्द कृषीमंत्री कोकाटे यांनीच अजित पवार यांच्यापुढे पडदा टाकून दिलगिरी व्यक्त केल्याचे बोलले जाते.

देवगाव शनी येथील 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे.

त्यानंतर कोकाटे हे आज थेट मुंबईहून शनी देवगाव (ता. वैजापूर) येथे 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले होते. सहाजिकच कृषिमंत्री कोकाटे यांना पत्रकारांचा गराडा पडला. परंतु त्यांनी आज अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त करत मी महंत रामगिरी महाराज यांनी दिलेल्या निमंत्रणावरून मी येथे आलो आहे आणि हा धार्मिक सोहळा आहे तेव्हा आपण (पत्रकार) मला त्याबद्दलच प्रश्न विचारा, अशी विनंती केली.यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, मागील वर्षी माझ्या मतदारसंघात पांचाळे येथे १७७ व्या सप्ताहाचे आयोजन केले गेले होते. सालाबादप्रमाणे यंदा १७८ व्या सप्ताहासाठी मला महंत रामगिरी महाराज यांनी वैयक्तिक निमंत्रण दिले होते. त्यामुळे या ठिकाणी येणे क्रमप्राप्त होते.आमच्या वारकरी संप्रदायाचे सप्ताह हे श्रद्धास्थान आहे.लाखो भाविक याठिकाणी येतात.यास अनन्यसाधारण असे महत्व आहे.माझे येथे येणे झाले म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.येथील आ. रमेश बोरणारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सर्वांच्या सहकार्याने नक्की यशस्वी होईल,असेही कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे शेवटी म्हणाले.

कृषीमंत्री ना.माणिकराव कोकाटे

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News