टिळकनगर इंडस्ट्रीजबाबतच्या आ.ओगले यांच्या भूमिकेचा निषेध-बेग;कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेणार

श्रीरामपूर –टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरुन आ. हेमंत ओगले यांनी घेतलेल्या भूमिकेचा आपण निषेध करत असून प्रदुषणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. होणारे प्रदुषण...

श्रीरामपूर –
टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरुन आ. हेमंत ओगले यांनी घेतलेल्या भूमिकेचा आपण निषेध करत असून प्रदुषणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. होणारे प्रदुषण कसे कमी करता येईल, शेतकऱ्यांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल, त्यासाठी कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेवून दोनही घटकांना न्याय मिळेल याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे आश्वासन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी दिले.टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरुन आ. हेमंत ओगले यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल परिसरात अनेक संघटनांकडून तीव्र आंदोलन सुरु आहे. टिळकनगर इंडस्टीजमुळे अनेक कामगारांचे कुटुंब व्यवस्था अवलंबून असून आधारीत उद्योगांवर अनेक लोकांचे संसार सुरु आहेत. आ. हेमंत ओगले यांनी विधानसभेत कारखाना बंद करण्याची केलेली मागणी ही अतिशय चूकीची असून त्याचा निषेधच आहे. त्यामुळे अनेकांचे प्रपंच धूळीस मिळतील, नागरीकांवर उपासमारीची वेळ येईल टिळकनगर इंडस्ट्रीज ही परिसराची कामधेनू आहे मागील ३०-३५ वर्षांपासून परिसरातील अनेकांना येथे रोजगार उपलब्ध झालेला आहे. अनेक कामगारांची रोजीरोटी कारखान्यामुळे सुरु आहे. कारखाना बंद करण्याची भूमिका घेतल्यास बेरोजगारीची समस्या निर्माण होणार आहे.कारखान्याच्या प्रदुषीत पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हे खरे आहे. त्या विरोधात शेतकरी वेगवेगळ्या स्तरावर आंदोलने करून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. एका बाजूला कारखाना सुरु राहीला पाहिजे, नोकऱ्या व रोजगार टिकला पाहिजे. दुसऱ्या बाजूला प्रदुषणग्रस्थ शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे, होणारे प्रदुषण कसे कमी करता येईल, शेतकर्यांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल, त्यासाठी कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेवून दोनही घटकांना न्याय मिळेल, याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे बेग यांनी सांगितले.

आ.हेमंत ओगले यांनी विधानसभेत कारखाना बंद करण्याची केलेली मागणी ही अतिशय चूकीची असून त्याचा निषेधच आहे. त्यामुळे अनेकांचे प्रपंच धूळीस मिळतील, नागरीकांवर उपासमारीची वेळ येईल टिळकनगर इंडस्ट्रीज ही परिसराची कामधेनू आहे मागील ३०-३५ वर्षांपासून परिसरातील अनेकांना येथे रोजगार उपलब्ध झालेला आहे,असे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी म्हटले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!