टिळकनगर इंडस्ट्रीजबाबतच्या आ.ओगले यांच्या भूमिकेचा निषेध-बेग;कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेणार

श्रीरामपूर –
टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरुन आ. हेमंत ओगले यांनी घेतलेल्या भूमिकेचा आपण निषेध करत असून प्रदुषणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. होणारे प्रदुषण कसे कमी करता येईल, शेतकऱ्यांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल, त्यासाठी कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेवून दोनही घटकांना न्याय मिळेल याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे आश्वासन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी दिले.टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरुन आ. हेमंत ओगले यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल परिसरात अनेक संघटनांकडून तीव्र आंदोलन सुरु आहे. टिळकनगर इंडस्टीजमुळे अनेक कामगारांचे कुटुंब व्यवस्था अवलंबून असून आधारीत उद्योगांवर अनेक लोकांचे संसार सुरु आहेत. आ. हेमंत ओगले यांनी विधानसभेत कारखाना बंद करण्याची केलेली मागणी ही अतिशय चूकीची असून त्याचा निषेधच आहे. त्यामुळे अनेकांचे प्रपंच धूळीस मिळतील, नागरीकांवर उपासमारीची वेळ येईल टिळकनगर इंडस्ट्रीज ही परिसराची कामधेनू आहे मागील ३०-३५ वर्षांपासून परिसरातील अनेकांना येथे रोजगार उपलब्ध झालेला आहे. अनेक कामगारांची रोजीरोटी कारखान्यामुळे सुरु आहे. कारखाना बंद करण्याची भूमिका घेतल्यास बेरोजगारीची समस्या निर्माण होणार आहे.कारखान्याच्या प्रदुषीत पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हे खरे आहे. त्या विरोधात शेतकरी वेगवेगळ्या स्तरावर आंदोलने करून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. एका बाजूला कारखाना सुरु राहीला पाहिजे, नोकऱ्या व रोजगार टिकला पाहिजे. दुसऱ्या बाजूला प्रदुषणग्रस्थ शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे, होणारे प्रदुषण कसे कमी करता येईल, शेतकर्यांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल, त्यासाठी कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेवून दोनही घटकांना न्याय मिळेल, याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे बेग यांनी सांगितले.

आ.हेमंत ओगले यांनी विधानसभेत कारखाना बंद करण्याची केलेली मागणी ही अतिशय चूकीची असून त्याचा निषेधच आहे. त्यामुळे अनेकांचे प्रपंच धूळीस मिळतील, नागरीकांवर उपासमारीची वेळ येईल टिळकनगर इंडस्ट्रीज ही परिसराची कामधेनू आहे मागील ३०-३५ वर्षांपासून परिसरातील अनेकांना येथे रोजगार उपलब्ध झालेला आहे,असे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News