नाफेड मार्फत 25 रुपये किलो प्रमाणे कांदा खरेदी करा;छावा संघटनेची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-सध्या कांद्याचे भाव पडलेले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कांद्याच्या भाववाढीसाठी तात्काळ उपाययोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति...

श्रीरामपूर-
सध्या कांद्याचे भाव पडलेले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कांद्याच्या भाववाढीसाठी तात्काळ उपाययोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति किलो दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,राहुरीचे तालुकाध्यक्ष अमोल वाळुंज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा दर वाढत नसल्याने तसेच साठवणुकीत कांद्याला कोंब येऊन तो सडू लागल्याने प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे आपण सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कांदा भाववाढीसाठी उपयोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना आधार द्यावा.बाजारसमितीमध्ये ही खरेदी न करता थेट शेतकऱ्याकडून साठवलेल्या एकूण कांद्यापैकी 60 टक्के कांदा जागेवर खरेदी करावा.नाफेडने चालू बाजार भावने खरेदी केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.बाजारसमिती मध्ये खरेदी केल्यास व्यापारी आपला मला नाफेडला देतील. त्यातही शेतकऱ्यांना काहीही पदरात पडत नाही. म्हणून कांदा थेट शेतकऱ्याकडून साठवलेल्या चाळीतून कृषी विभागाच्या मदतीने खरेदी करावा. तसेच कांदा निर्यातवाढ होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून राज्य सरकार मार्फत प्रयत्न करावेत.राज्यातील जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे  जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,तालुकाध्यक्ष राहुरी अमोल वाळूज,अक्षय पटारे, गोवर्धन गोरे, राजेंद्र भिंगारे, बाबासाहेब भणगे यांनी केली आहे.

छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,राहुरीचे तालुकाध्यक्ष अमोल वाळुंज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!