बनावट चलनी नोटांचा पर्दापाश;80 हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी पकडल्या;17 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर-
रूईछत्तीशी ता.जि.अहिल्यानगर येथे नगर तालूका पोलिसांनी दोन जणांना बनावट नोटा प्रकरणी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून 80 हजार रुपयांच्या 160 बनावट नोटा व 2 हजार 870 रु.च्या ख-या नोटा जप्त केल्या असून त्यांच्या ताब्यातून 3 अँन्ड्रॉईड मोबाईल व महींद्रा कंपनीची थार गाडी असा एकूण 17 लाख 37 हजार 870 रू. किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीं विरूद्ध नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि.27/07/2025 रोजी नगर तालूका पो स्टे चे स.पोनी. प्रल्हाद गिते यांना गोपनीय माहीती मिळाली कि, रूईछत्तीशी ता.जि.अहिल्यानगर गावात बायपास रोड येथे दोन जण एका महिंद्रा कंपनीची थार गाडीमधून बनावट भारतीय चलनी नोटा त्या खऱ्या आहेत असे भासवून व्यवहार करण्याकरीता येत आहेत. त्यावरून सपोनी. प्रल्हाद गिते यांनी तात्काळ पोहेकाँ खंडेराव संताजी शिंदे, व चासफौ दिनकर बाबुराव घोरपडे यांना कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी रूईछत्तीशी गावात जावून सापळा लावला. तेव्हा त्यांना माहिती मिळाल्याप्रमाणे वाहन येताना दिसले. तेव्हा पोलिसांनी वाहनास थांबण्यास सांगितले.वाहनातील इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी सोमनाथ माणीक शिंदे वय 25 वर्षे रा. तपोवन रोड, ता.जि. अहिल्यानगर, निखील शिवाजी गांगडे वय 27 वर्षे रा. कुंभळी ता. कर्जत जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.पोलिसांनी त्यांची अंगझडती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यानी अंगझडती देण्यास नकार दिला.पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी अंगझडती व वाहनाची झडती पोलिसांना घेऊ दिली असता त्यांच्या ताब्यातुन हुबेहुब भारतीय चलनाच्या 500 रूपयाच्या बनावट 160 नोटा त्यांची किं.80,000/- मिळून आल्या. 2870 रु. च्या ख-या भारतीय चलनाच्या नोटा मिळून आल्या. तसेच त्यांच्याकडून 3 अँन्ड्रॉईड मोबाईल व महींद्रा कंपनीची थार गाडी असा एकूण 17 लाख 37 हजार 870 रू किं चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून त्यांचे विरूद्ध नगर तालुका पो स्टे गुर नं 628/2025 भा.न्या.स कलम 2023 चे कलम 179,180,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोसई भरत बाजीराव धुमाळ हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक  सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी केली.

नगर तालूका पोलिसांनी दोन जणांना बनावट नोटा प्रकरणी ताब्यात घेतले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

Latest News

Trending News