आ.ओगले यांच्या फोटोला मारले जोडे;दत्तनगर- टिळकनगर चौफुलीवर ‘जोडे मारो’ आंदोलन;विधानमंडळातील तक्रार मागे घेण्याची मागणी

श्रीरामपूर-
श्रीरामपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत ओगले यांनी पावसाळी अधिवेशनात येथील टिळकनगर इंडस्ट्रीजविषयी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करत दत्तनगर, टिळकनगर, एकलहरे आणि रांजणखोल येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या निषेधाचा भाग म्हणून ग्रामस्थांनी दत्तनगर- टिळकनगर चौफुलीवर आ.ओगले यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन करून संताप व्यक्त केला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आमदार ओगले यांनी विधानमंडळात टिळक नगर इंडस्ट्रीजला बदनाम करण्याचा, आणि त्यामुळेच त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

ग्रामस्थांनी आपली मागणी असलेले निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय दीपक मेढे यांना दिले.

या प्रकाराचा निषेध करत रिपब्लिकन पक्षाचे विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, तालुका संघटक संजय बोरगे तसेच जय भीम आर्मीचे सचिन ब्राह्मणे आणि राजू त्रिभुवन यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाआ. ओगले यांनी आपली विधानमंडळातील तक्रार त्वरित मागे घ्यावी आणि टिळकनगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर येऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांच्याविरोधात अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.या आंदोलनानंतर ग्रामस्थांनी आपली मागणी असलेले निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय दीपक मेढे यांना दिले.यावेळी अशोक नगर कारखान्याचे संचालक अमर आप्पा ढोकचौळे प्रदीप गायकवाड विशाल सुरडकर संदीप बागुल डॉ. सुधीर ब्राह्मणे राजू खाजेकर आनंद चावरे प्रदीप कदम शरद भनगे रमेश ढोकचौळे इज्जॉस शेख जाना भाऊ खाजेकर राजू त्रिभुवन रावसाहेब ढोकचौळे त्याचप्रमाणे परिसरातील संपूर्ण महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय बोरगे यांनी केले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News