अशोकने उसाला ३५०० रुपये दर द्यावा;शेतकरी संघटना व सभासदांची निवेदनाद्वारे मागणी;अशोकच्या प्रशासनासह जिल्हा बँकेचे संचालक ससाणे यांनाही निवेदन

श्रीरामपूर-अशोक कारखाना ही एक तालुक्यातील अर्थकरणाची मोठी संस्था असून संस्थेचे कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगाम २०२५-२६ साठी उसाला ३५०० रु. प्रति टन...

श्रीरामपूर-
अशोक कारखाना ही एक तालुक्यातील अर्थकरणाची मोठी संस्था असून संस्थेचे कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगाम २०२५-२६ साठी उसाला ३५०० रु. प्रति टन दर द्यावा.तसेच मागील दोन हंगामाचे प्रतिटन ८०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी संघटना, सभासद, कामगार व व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात आली.निवेदनाची प्रत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचेसह अशोकचे कार्यकारी संचालक संतोष देवकर यांना देण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की मागील दोन गाळप हंगामात इतर कारखान्यांसह गणेशच्या तुलनेत ८०० प्रति मे .टनाने दर कमी दिलेला आहे. वास्तविक आपणाकडून सातत्याने गणेश कारखान्याची बदनामी करून व सभासदांमध्ये भीती घालून ऊस उत्पादकांची गेल्या ३०-३५ वर्षापासून दिशाभूल केली गेली आहे. मागील दोनही गाळप हंगामामध्ये गणेश कारखान्याने ३००० प्रति टनानी ऊस उत्पादकांचे पैसे कुठल्याही वित्तीय संस्थेची अर्थात जिल्हा बँकेची सक्तीची कपात न करता दिले आहेत. सदर कारखान्याचा एकही संचालक जिल्हा बँकेच्या व्यवस्थापन समितीवर नसून आपण जिल्हा बँकेच्या संचालक मंडळपदी असूनही ऊस उत्पादकांची सक्तीने कपात केली आहे. आपण ऊस उत्पादकांच्या सक्तीने कपाती करून ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडवले आहे.

अशोकचे कार्यकारी संचालक संतोष देवकर यांना शेतकरी संघटनाव सभासदांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

आपण प्रत्त्येक सर्वसाधारण सभेत व प्रत्त्येक निवडणुकीत गणेश कारखाना सत्तांतरामुळे आजारी असल्याचे सातत्याने सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. वास्तविक गणेश कारखाना साखर निर्मिती करून मागील दोनही हंगामात ३००० रुपये प्रति टन दर देऊ शकतो. परंतु आपण सातत्याने गणेश पेक्षा ३०० रुपये साखर निर्मितीमध्ये कमी दिले. साहजिकच उपपदार्थ निर्मिती मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून किमान पाचशे रुपये प्रति टन गृहीत धरल्यास  गणेश पेक्षा ८००/-रुपये प्रति टन जास्त देणे व्यवहार्य होते. परंतु आपणाकडून २७०० रुपये प्रति टन दर देऊन व जिल्हा बँकेची सक्तीची वसुली करून ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे.कारखाना कर्मचाऱ्यांचे ही पगार सात-सात महिने उशिराने होत आहे.या सर्व चुकीच्या बाबींमुळे ऊस उत्पादक सभासद व कामगारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये अशोकच्या शेजारील राहुरी, गणेशसह वैजापूर तालुक्यातील पंचगंगा हा खाजगी नव्याने कारखाना सुरू होत आहे. पंचगंगा शुगर अशोकच्या कार्यक्षेत्रात ३०५० रुपये प्रति टनाने नोंदी घेत आहे.त्यामुळे सुरू होणाऱ्या हंगामासाठी ३५००/-रुपये प्रति टन दर बॉयलर पेटविण्यापूर्वी सर्वसाधारण सभेत घोषित करणे कारखान्याच्या हितरक्षणासाठी गरजेचे आहे.निवेदनाचा उद्देश  कुठलीही राजकीय भूमिका नसून अशोक कारखाना ही तालुक्याची कामधेनू असून ती वाचली पाहिजे हाच आहे,असे शेवटी म्हटले आहे.
शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, डॉ. दादासाहेब आदिक , डॉ. विकास नवले, सुजित बोडके, शिवाजी पटारे , संजय काळे, बबनराव उघडे, इंद्रभान चोरमळ, संदीप अभंग, भागचंद औताडे, कडू पवार, अकबर शेख आदिंसह ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी संघटना, सभासद, कामगार व व्यापारी बांधवांच्या वतीने निवेदनाची प्रत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनाही देण्यात आली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!