अशोकने उसाला ३५०० रुपये दर द्यावा;शेतकरी संघटना व सभासदांची निवेदनाद्वारे मागणी;अशोकच्या प्रशासनासह जिल्हा बँकेचे संचालक ससाणे यांनाही निवेदन

श्रीरामपूर-
अशोक कारखाना ही एक तालुक्यातील अर्थकरणाची मोठी संस्था असून संस्थेचे कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगाम २०२५-२६ साठी उसाला ३५०० रु. प्रति टन दर द्यावा.तसेच मागील दोन हंगामाचे प्रतिटन ८०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी संघटना, सभासद, कामगार व व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात आली.निवेदनाची प्रत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचेसह अशोकचे कार्यकारी संचालक संतोष देवकर यांना देण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की मागील दोन गाळप हंगामात इतर कारखान्यांसह गणेशच्या तुलनेत ८०० प्रति मे .टनाने दर कमी दिलेला आहे. वास्तविक आपणाकडून सातत्याने गणेश कारखान्याची बदनामी करून व सभासदांमध्ये भीती घालून ऊस उत्पादकांची गेल्या ३०-३५ वर्षापासून दिशाभूल केली गेली आहे. मागील दोनही गाळप हंगामामध्ये गणेश कारखान्याने ३००० प्रति टनानी ऊस उत्पादकांचे पैसे कुठल्याही वित्तीय संस्थेची अर्थात जिल्हा बँकेची सक्तीची कपात न करता दिले आहेत. सदर कारखान्याचा एकही संचालक जिल्हा बँकेच्या व्यवस्थापन समितीवर नसून आपण जिल्हा बँकेच्या संचालक मंडळपदी असूनही ऊस उत्पादकांची सक्तीने कपात केली आहे. आपण ऊस उत्पादकांच्या सक्तीने कपाती करून ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडवले आहे.

अशोकचे कार्यकारी संचालक संतोष देवकर यांना शेतकरी संघटनाव सभासदांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

आपण प्रत्त्येक सर्वसाधारण सभेत व प्रत्त्येक निवडणुकीत गणेश कारखाना सत्तांतरामुळे आजारी असल्याचे सातत्याने सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. वास्तविक गणेश कारखाना साखर निर्मिती करून मागील दोनही हंगामात ३००० रुपये प्रति टन दर देऊ शकतो. परंतु आपण सातत्याने गणेश पेक्षा ३०० रुपये साखर निर्मितीमध्ये कमी दिले. साहजिकच उपपदार्थ निर्मिती मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून किमान पाचशे रुपये प्रति टन गृहीत धरल्यास  गणेश पेक्षा ८००/-रुपये प्रति टन जास्त देणे व्यवहार्य होते. परंतु आपणाकडून २७०० रुपये प्रति टन दर देऊन व जिल्हा बँकेची सक्तीची वसुली करून ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे.कारखाना कर्मचाऱ्यांचे ही पगार सात-सात महिने उशिराने होत आहे.या सर्व चुकीच्या बाबींमुळे ऊस उत्पादक सभासद व कामगारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये अशोकच्या शेजारील राहुरी, गणेशसह वैजापूर तालुक्यातील पंचगंगा हा खाजगी नव्याने कारखाना सुरू होत आहे. पंचगंगा शुगर अशोकच्या कार्यक्षेत्रात ३०५० रुपये प्रति टनाने नोंदी घेत आहे.त्यामुळे सुरू होणाऱ्या हंगामासाठी ३५००/-रुपये प्रति टन दर बॉयलर पेटविण्यापूर्वी सर्वसाधारण सभेत घोषित करणे कारखान्याच्या हितरक्षणासाठी गरजेचे आहे.निवेदनाचा उद्देश  कुठलीही राजकीय भूमिका नसून अशोक कारखाना ही तालुक्याची कामधेनू असून ती वाचली पाहिजे हाच आहे,असे शेवटी म्हटले आहे.
शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, डॉ. दादासाहेब आदिक , डॉ. विकास नवले, सुजित बोडके, शिवाजी पटारे , संजय काळे, बबनराव उघडे, इंद्रभान चोरमळ, संदीप अभंग, भागचंद औताडे, कडू पवार, अकबर शेख आदिंसह ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी संघटना, सभासद, कामगार व व्यापारी बांधवांच्या वतीने निवेदनाची प्रत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनाही देण्यात आली.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News